मुंबई : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपने तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन दिवसाच्या आधी आरोप केले काल पक्षप्रवेश केला आणि आज थेट अशोक चव्हाण यांना उमेदवारी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉंग्रेसमधून शिंदे गटात आलेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर घणाघात चढवला आहे.
हेही वाचा…कोण आहेत डॉ. अजित गोपछडे ? भाजपकडून राज्यसभेसाठी ‘तीन’ उमेदवार मैदानात
काँग्रेस-मुक्त राजकारण, घराणेशाही-मुक्त राजकारण आणि भ्रष्टाचार-मुक्त राजकारण या सर्व दाव्यांसाठी, महाराष्ट्रातील भाजप पुरस्कृत खोके राजवट कदाचित महाराष्ट्रातील कॉंग्रेसमधील ३ लोकांना राज्यसभेवर पाठवत आहे. ते सर्व घराणेशाहीतील आहेत, ते सर्व गेल्या ४० दिवसांत उडी मारून आलेले आहेत आणि त्यांच्यापैकी किमान २ जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. काँग्रेसविरोधात लढणारे भाजपचे कार्यकर्ते कुठे गेले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा…शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून अनेपक्षित उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
दरम्यान, विशेषत: जे कॉंग्रेसचा द्वेष करत होते. ते आता ‘भाजप महाराष्ट्र’ सर्व भ्रष्टाचारींना स्वतःच सामावून घेत आहे. काँग्रेसच्या याच व्यक्तींविरोधात आजवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता आणि विरोधी प्रचारही केला होता, आता हेच पदांवर बसणार आणि तुम्हाला मुजरा करावा लागणार. मला वाटतं आता भाजपची नवी मोहीम ‘अच्छे दिन’ नाही तर, ‘दाग अच्छे है’ झालीये! असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरे गटाचे काही नेते आमच्या संपर्कात, येत्या दोन ते तीन दिवसात…” कुणी केला मोठा दावा ?
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना सरकारने फसवले, आश्वासन पूर्ण केले तर उपोषणाची वेळ का आली?”
हेही वाचा…भाजपकडून आयारामांना राज्यसेभेची उमेदवारी, निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच, कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या
राज्यसभेची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा..पार्थ पवार राज्यसभेवर जाणार ? रोहित पवार संतापले, म्हणाले की, अभ्यासू लोकांना..