मुंबई : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपने तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन दिवसाच्या आधी आरोप केले काल पक्षप्रवेश केला आणि आज थेट अशोक चव्हाण यांना उमेदवारी झाली आहे. यातच आता राज्यसभेची निवडणुक जाहीर होताच अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झालाय,” नारायण राणे मनोज जरांगे पाटलांवर संतापले
यातच राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत. चव्हाण म्हणाले की, माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी माझ्या कामातून सार्थ दाखवून देईल. राज्यसभेत सामान्य माणसाचे प्रश्न उचलणे आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहिल.तसेच या नेत्यांनी माझ्यासारख्या पक्षात नव्या आलेल्या नेत्यावर विश्वास दाखविल्याबाबत मी त्यांचा खूप आभारी आहे. असेही चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा…महाराष्ट्रात कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर, कॉंग्रेसने पुन्हा लंगड्या उमेदवारावर डाव टाकला
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीकरिता भाजपकडून तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी तसेच डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. यातच अजित पवार गटाकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचापार्थ पवार राज्यसभेवर जाणार ? रोहित पवार संतापले, म्हणाले की, अभ्यासू लोकांना..
हेही वाचा…कोण आहेत डॉ. अजित गोपछडे ? भाजपकडून राज्यसभेसाठी ‘तीन’ उमेदवार मैदानात
हेही वाचा…शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून अनेपक्षित उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
हेही वाचा…राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी, भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर
जरांगे पाटलांनी लोकसभेची निवडणुक लढवावी, मतदारसंघही ठरवला, कुणी दिला हा सल्ला ?