मुंबई : मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटलांची तब्येत आता बिघडली आहे. जरांगे पाटलांच्या नाकातून आता रक्तस्त्राव देखील सुरू झाला असून उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला आहे. यातच आता मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुक लढवावी, असा सल्ला वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांसाठी लोकसभा मतदारसंघ देखील सांगितला आहे.
हेही वाचा…निवडणुका येईपर्यंत सगळे आरोपी भाजपमध्ये दिसतील, मग ‘देवाभाऊ’ घसा खरडून कोणावर आरोप करतील ?
मनोज जरांगे पाटलांनी येत्या २०२४ च्या लोकसभेची निवडणूक लढवावी. जरांगे पाटील यांनी जालन्यातून आपली उमेदवारी जाहीर करावी. त्यांच्याबरोबर आमचे जालन्यातील पदाधिकारी चर्चा करतील. ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचा प्रश्न कायम तेवत ठेवता येईल. लोकसभेच्या माध्यमातूनच तो सोडवता येईल. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. ते आमचा सल्ला मान्य करतील असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…भाजप शिंदे गटाला देणार झटका, नारायण राणे रत्नागिरी- सिंधूदुर्गातून लोकसभेच्या रिंगणात
दरम्यान, मराठा समाजाचा प्रश्न दुर्लक्ष करण्यासारखा नाही. परंतु तरीही राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांकडे सरकार दुलर्क्ष करतांना दिसत आहेत. सरकारने मध्यंतरी कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन निर्णय काढला होता. शिंदे समितीमार्फत आमचे काम चालू आहे, असे सरकारकडून सांगितले जात आहे. परंतु लोकसभेची निवडणूक संपल्यावर या प्रश्नाकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होईल. अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झालाय,” नारायण राणे मनोज जरांगे पाटलांवर संतापले
हेही वाचा…महाराष्ट्रात कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर, कॉंग्रेसने पुन्हा लंगड्या उमेदवारावर डाव टाकला
हेही वाचा…“शरद पवार आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार का ?” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ? हालचाली वाढल्या
दादांसाठी विधानसभेत डावललं, आता राज्यसभेच्या रिंगणात, मेधा कुलकर्णींना लागणार मोठी लॉटरी ?