मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजकीय दबावापोटी भाजपात प्रवेश केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांच्यावर याआधी आदर्श सोसायटीत नातेवाईकांना प्लॅट दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच आदर्श घोटाळ्याची अलिकडेच केंद्र सरकारने श्वेतपत्रिका काढली. त्यानंतर लगेचच अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने महायुतीत खळबळ, महायुतीच्या मित्र पक्षानेच भाजपला कडक इशारा
आदर्श घोटाळ्यावरून अशोक चव्हाण यांच्यावर याआधी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आरोप केले होते. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना प्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला होता. तर या आधी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर लगेचच अजित पवारांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. यावरून निवडणुका येईपर्यंत सगळे आरोपी भाजपमध्ये दिसतील. मग देवा भाऊ घसा खरडून कोणावर आरोप करतील ? असा खोचक सवाल प्रशांत जगताप यांनी केला आहे.
हेही वाचा…“कॉंग्रेस तसा मोठा सागर, एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही”
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने जे नाही ते प्रयत्न करण्यास सुरूवात केली आहे. देशातील तसेच राज्यातील अनेक महत्वाचे नेते ज्यांच्यावर आधी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांना आता आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. त्यावरून विरोधक भाजपवर जोरदार टोलेबाजी करतांना दिसत आहे. यातच आता अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसचे अनेक नेते आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
निवडणुका येईपर्यंत सगळे आरोपी भाजपमध्ये दिसतील..
मग देवा भाऊ घसा खरडून कोणावर आरोप करतील ?— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 13, 2024
READ ALSO :
हेही वाचा…भाजप शिंदे गटाला देणार झटका, नारायण राणे रत्नागिरी- सिंधूदुर्गातून लोकसभेच्या रिंगणात
हेही वाचा…“आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला, तो भाजपलाच धक्का”
हेही वाचा…“अशोक चव्हाण हे दोन वर्षापुर्वीच कॉंग्रेस सोडणार होते, पण…. कुणी केला हा दावा ?
“नांदेड कुणा एका व्यक्तीचा बालेकिला नाही,” नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर पहिला वॉर
हेही वाचा…“अशोक चव्हाण मैदान सोडून पळून गेले, इतकं डरपोक असू नये “, कॉंग्रेसच्या नेत्याने तोफ डागली