मुंबई : राज्यातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेचे आमदार राजूरकर यांनी देखील भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला आणखी मोठं बळ मिळालं असून यावेळी अशोक चव्हाण यांचा उल्लेख राष्ट्रीय नेता म्हणून करत फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
हेही वाचा…अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? फडणवीसांनी दिले ‘हे’ संकेत
अशोक चव्हाण हे दोन वर्षापुर्वीच कॉंग्रेस सोडणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. दोन वर्षापुर्वी ते एकनाथ शिंदे यांच्याासोबतच बाहेर पडण्याची, कॉंग्रेस सोडण्याची त्यांची योजना होती. असा मोठा दावाही राऊतांनी केला. तसचे अशोक चव्हाण आत्ताच नाही तर गेल्या काही काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपडताय. त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल. तसेच नांदडेमध्ये सलग दोन लोकसभा निवडणुका अशोक चव्हाण हरले आहेत. त्यांच्या पत्नी आणि ते मोठे नेते असून त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे नांदेड कुणाचा बालेकिल्ला नाही तर नांदेडमध्ये कॉंग्रेसचा उमेदवार निवडणूक लढेल आणि जिकेंलही असा दावाही त्यांनी केलाय.
हेही वाचा…कमळाच्या बागेत अशोकाचं झाड; अखेर अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, सर्वात पहिली प्रतिक्रिया… म्हणाले…
दरम्यान., प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांना प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर सही करून अशोक चव्हाण यांना पक्षात रितसर प्रवेश दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. तसेच यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांचा राष्ट्रीय नेता म्हणून उल्लेख करत मोठे संकेत दिले आहेत. यावेळी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत विचारले असता. त्यावर म्हणाले की, अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा अनुभव राहिलेला आहे. त्याचा आम्ही फायदा घेऊयात. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचं केंद्र करेल, असेही फडणवीस म्हणाले.
READ ALSO :
“नांदेड कुणा एका व्यक्तीचा बालेकिला नाही,” नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर पहिला वॉर
हेही वाचा…“अशोक चव्हाण मैदान सोडून पळून गेले, इतकं डरपोक असू नये “, कॉंग्रेसच्या नेत्याने तोफ डागली
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने महायुतीत खळबळ, महायुतीच्या मित्र पक्षानेच भाजपला कडक इशारा
हेही वाचा…“कॉंग्रेस तसा मोठा सागर, एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही”
हेही वाचा…“भाजपाची स्मरणशक्ती कमजोर, का ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ? नाना पटोलेंचा भाजपला सवाल