मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नांदेडमधील सर्व नेते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा करण्यात येत आहे. त्यावर आता नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नांदेड हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असून कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा नाही. त्यामुळे नांदेडमधून कॉंग्रेसचाच उमेदवार निवडून येईल. अनेक नांदेडमधील लोक याठिकाणी आले असून त्यांनी आमच्याकडे उमेदवार देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आमच्याकडे नांदेडमध्ये उमेदवार देण्याची काही कमी नाहीत. आमच्याकडे अजूनही भरपुर उमेदवार आहेत. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
हेही वाचा…कमळाच्या बागेत अशोकाचं झाड; अखेर अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, सर्वात पहिली प्रतिक्रिया… म्हणाले…
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व्हेत राज्यात इंडीया आघाडीच्या जागा जास्त दाखवत आहेत. त्यामुळे आपली इज्जत वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस असे अयशस्वी प्रयत्न करीत आहे. त्यांचे हे प्रयत्न कधीही यशस्वी ठरणार नाहीत. येत्या पंधरा तारखेला आमची एक महत्वाची बैठक असून कॉंग्रेसचे सर्व आमदार यासाठी हजर राहणार आहेत. यातच सोळा ते सतरा तारखेला लोणावळ्यात पक्षाचं शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. त्या शिबीरात देखील सर्व आमदार उपस्थित राहणार असून ज्या अफवा चालेल्या आहेत. त्याला पुर्णविराम द्यावा. अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज प६कार परिषदेत दिली आहे.
हेही वाचा…मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच मिळणार, मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यानंतर कॉंग्रेसला भलं मोठं भगदाट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याआधीच कॉंग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. तर या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण यांच्यासह भाजपवर जोरदार टिका केली. भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. व्हाईट पेपरमध्ये आदर्श घोटाळ्याबाबत बोलले आणि मोदी आणि अमित शाह यांना जे कोणी भेटतं ते पापमुक्त होतं. असं म्हणत भाजप वॉशिंग मशीन आहे का ? असा सवाल महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…“अशोक चव्हाण मैदान सोडून पळून गेले, इतकं डरपोक असू नये “, कॉंग्रेसच्या नेत्याने तोफ डागली
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने महायुतीत खळबळ, महायुतीच्या मित्र पक्षानेच भाजपला कडक इशारा
हेही वाचा…“कॉंग्रेस तसा मोठा सागर, एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही”
हेही वाचा…“भाजपाची स्मरणशक्ती कमजोर, का ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ? नाना पटोलेंचा भाजपला सवाल
अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? फडणवीसांनी दिले ‘हे’ संकेत