मुंबई : आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत होती. आम्ही नसल्यावर बघू आता काय होतं. ज्या लोकांवर आरोप केले त्यांचा पक्षप्रवेश घेतला. याचे उत्तर आता येणाऱ्या निवडणुकीत जनताच देईल. असा एल्गार आता राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपच्याविरोधात पुकारला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्यात आणखी एक मोठा राजकीय भूंकप घडला आहे. त्यानंतर आता महादेव जानकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा कॉंग्रेसला राम राम..,! काय आहे आदर्श घोटाळा ? वाचा सविस्तर
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत मला कल्पना नाही. बातम्यांतून मला कळले. अभ्यास करून त्यावर बोलेन. जे खरे लोक आहेत ते राहतात. ज्यांना काही अडचणी आहेत. ते असे निर्णय घेत असतील. आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत होती. आम्ही नसल्यावर बघू आता काय होते. ज्या लोकांवर आरोप केले त्यांचा पक्ष प्रवेश घेतला. याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत जनताच देईल. असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला आहे.
हेही वाचा…बालवाडीत असलेली मुलं सुद्धा हा जॉनी कोण ते सांगतील..! शरद पवार गटाचा चव्हाणांना टोला
दरम्यान, लोकसभा निवडणुकीबाबत महादेव जानकर यांनी भाष्य केले. राष्ट्रीय समाज पक्ष भारतात जिथे उमेदवार मिळतील त्या सर्व ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील ८०, महाराष्ट्रातील ४८, कर्नाटक, छत्तीसगड या ठिकाणाच्याही निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच माढा आणि परभणी या ठिकाणी मी स्वत: निवडणूक लढवणार आहे. विरोधख कोणीही असला तरी दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून येणारअसेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“कॉंग्रेस तसा मोठा सागर, एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही”
हेही वाचा…“भाजपाची स्मरणशक्ती कमजोर, का ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ? नाना पटोलेंचा भाजपला सवाल
अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? फडणवीसांनी दिले ‘हे’ संकेत
हेही वाचा…कमळाच्या बागेत अशोकाचं झाड; अखेर अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, सर्वात पहिली प्रतिक्रिया… म्हणाले…
हेही वाचा…मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणच मिळणार, मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर