मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण यांना रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे नते व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या अपेक्षांवर पाणी पडणार असल्याचे मानले जात आहे. याचसोबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“कॉंग्रेस तसा मोठा सागर, एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही”
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. केंद्र सरकारमधील राज्यसभेच्या मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. राणे यांच्या राज्यसभा खासदारकीची मुदत आता संपत असून त्यांना रत्नागिरी-सिंदुधूर्गातून निवडणुक लढवण्यासाठी तयारी करण्याची सुचना भाजप नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे उच्चस्तरिय सुत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“भाजपाची स्मरणशक्ती कमजोर, का ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ? नाना पटोलेंचा भाजपला सवाल
दरम्यान, शिवसेना-भाजपच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता आणि सध्या विनायक राऊत हे खासदार असून शिवसेनेचे सर्व मतदारसंघ आपल्याला मिळावेत अशी शिंदे गटाची मागी आहे. पण ते देण्याची भाजपची तयारी नाही. रत्नागिरी-सिंधुदूर्ग या मतदारसंघात किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. ही जागा शिवसेनेची असल्याने ती शिंदे गटाला हवी आहे. सामंत लोकसभा निवडणुक लढणार असल्याचे पोस्टर्सही मतदारसंघात कार्यकर्त्यांनी लावले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला, तो भाजपलाच धक्का”
हेही वाचा…“अशोक चव्हाण हे दोन वर्षापुर्वीच कॉंग्रेस सोडणार होते, पण…. कुणी केला हा दावा ?
“नांदेड कुणा एका व्यक्तीचा बालेकिला नाही,” नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर पहिला वॉर
हेही वाचा…“अशोक चव्हाण मैदान सोडून पळून गेले, इतकं डरपोक असू नये “, कॉंग्रेसच्या नेत्याने तोफ डागली
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने महायुतीत खळबळ, महायुतीच्या मित्र पक्षानेच भाजपला कडक इशारा