अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या संवाद मेळाव्यातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. काल छत्रपती संभाजीनगर येथे संवाद साधल्यानंतर त्यांची आज नगरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभांमधून ठाकरे सध्या भाजपवर जोरदार टिका करतांना दिसत आहेत. अवकाळीचा फटका बसला आहे. दुष्काळात अशोक चव्हाणांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी ते मोदींच्या दारात गेले आहेत. मोदी १० वर्षांपासून स्वप्न बघत असून मोदी ३ तास झोपतात. त्यांना स्वप्न पडतात कधी ? असा सवाल देखील त्यांनी केला.
हेही वाचा…“भाजपाची स्मरणशक्ती कमजोर, का ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ? नाना पटोलेंचा भाजपला सवाल
आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला. तो भाजपलाच धक्का आहे. कॉंग्रेस किंवा महाविकास आघाडीला नाही. असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपवर कडाडून टिका देखील केली. तसे सडलेले पानं झडली गेली आणि नवा कोंब फुटतात. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि खासदारकी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पद घ्यायचे हीच मोदी गॅरंटी म्हणत त्यांनी मोदींवर देखील टिका केली.
हेही वाचा…अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? फडणवीसांनी दिले ‘हे’ संकेत
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टिका केली. ते म्हणाले की, फडणवीस यांना काय बोलावे फरक पडत नाही. फडतुस बोललो, नालायक बोललो. काही फरक पडत नाही. निर्लज्जम सदादुखी आहेत. पाव मुख्यमंत्री आहे तरीही काही वाटत नाही. मिंध्याला मुख्यमंत्री बनवले, जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे ते विचार करत असतील कोणासाठी काम करतोय. या उपऱ्यासाठी का ? असा खोचक सवाल करत त्यांनी फडणवीसांना डिवचलं.
READ ALSO :
हेही वाचा…“अशोक चव्हाण हे दोन वर्षापुर्वीच कॉंग्रेस सोडणार होते, पण…. कुणी केला हा दावा ?
“नांदेड कुणा एका व्यक्तीचा बालेकिला नाही,” नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर पहिला वॉर
हेही वाचा…“अशोक चव्हाण मैदान सोडून पळून गेले, इतकं डरपोक असू नये “, कॉंग्रेसच्या नेत्याने तोफ डागली
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने महायुतीत खळबळ, महायुतीच्या मित्र पक्षानेच भाजपला कडक इशारा
हेही वाचा…“कॉंग्रेस तसा मोठा सागर, एक गेला म्हणजे पक्ष संपत नाही”