पुणे : येत्या २८ फेब्रुवारी रोजी होण्याऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीकरीता अर्ज सादर करण्यासाठी दोनच दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अनेकांनी नावे चर्चेत आली आहेत. यातच आता भाजपच्या कोथरूडच्या माजी आमदार आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पालिकेकडे थकबाकीचे ना हरकत प्रमाणपत्र तातडीने मागितले आहे. त्यामुळे कुलकर्णी यांनी प्रमाणपत्र मागितल्याने त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का ? की त्या लोकसभेला इच्छूक आहेत. याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“अशोक चव्हाण मैदान सोडून पळून गेले, इतकं डरपोक असू नये “, कॉंग्रेसच्या नेत्याने तोफ डागली
राज्यसभेच्या रिक्त सहा जागांसाठी निवडणुक जाहीर झाली आहे. परंतु त्यासाठी अद्यापही कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. यातच आता मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचं कारणही तितकचं महत्वाचं असून लोकप्रतिनिधींना उमेदवारी अर्ज दाखल करताना स्थानिक स्वराज्य संस्थांचे देणे बाकी नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यासाठी कुलकर्णी यांनी अर्ज केला आहे. आतापर्यंत पालिकेकडे पुण्यातून असा एकमेव अर्ज आल्याने कुलकर्णी यांच्या उमेदवारीच्या चर्चंना उधाण आलं आहे.
हेही वाचा…अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने महायुतीत खळबळ, महायुतीच्या मित्र पक्षानेच भाजपला कडक इशारा
दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्यावर ६४ हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना डावलून मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर पुण्यात भाजपच्या अंतर्गत राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर मेधा कुलकर्णी यांना विधान परिषद, तसेच राज्यसभेवर पाठवण्यात येणार अशा चर्चा देखील होत्या. तेव्हापासून मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन कुठे होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुका येईपर्यंत सगळे आरोपी भाजपमध्ये दिसतील, मग ‘देवाभाऊ’ घसा खरडून कोणावर आरोप करतील ?
हेही वाचा…भाजप शिंदे गटाला देणार झटका, नारायण राणे रत्नागिरी- सिंधूदुर्गातून लोकसभेच्या रिंगणात
हेही वाचा…“आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला, तो भाजपलाच धक्का”
हेही वाचा…“अशोक चव्हाण हे दोन वर्षापुर्वीच कॉंग्रेस सोडणार होते, पण…. कुणी केला हा दावा ?
“नांदेड कुणा एका व्यक्तीचा बालेकिला नाही,” नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर पहिला वॉर