पुणे : राज्यात झालेल्या पक्ष फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण सगळचं बदलून गेलं आहे. यातच आज शरद पवार यांनी शरद पवार गटातील सर्व नेत्यांची तातडीने बैठक घेतली असून शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर निवडणुक आयोगाने चिन्ह आणि पक्षनाव अजित पवार गटाला दिल्यानंतर तसेच आमदार अपात्रता निर्णय देखील लांबणीवर गेल्याने शरद पवार गट आता सगळ्यांनाच धक्का देण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा…“नांदेड कुणा एका व्यक्तीचा बालेकिला नाही,” नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांवर पहिला वॉर
निवडणुक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना देण्यात आले आहे. पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार गटाने सर्व कार्यालयातून चिन्ह आणि झेंडे काढून घेतले आहेत. यातच निवडणुक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेले, परंतु त्यावर अद्यापही कोणतीही सुनावणी झाली नाही. यातच कालच कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा…“अशोक चव्हाण मैदान सोडून पळून गेले, इतकं डरपोक असू नये “, कॉंग्रेसच्या नेत्याने तोफ डागली
दरम्यान, देशातील तसेच राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता सत्ताधारी पक्ष निवडणुक जिंकण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करतांना दिसत आहेत. तर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देण्याचंही काम देखील सुरू आहे. तर अनेक आमदार, पदाधिकाऱ्यांनी साथ सोडली आहे. याच सर्व घटनांचा विचार केला असता शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे.
READ ALSO :
दादांसाठी विधानसभेत डावललं, आता राज्यसभेच्या रिंगणात, मेधा कुलकर्णींना लागणार मोठी लॉटरी ?
हेही वाचा…निवडणुका येईपर्यंत सगळे आरोपी भाजपमध्ये दिसतील, मग ‘देवाभाऊ’ घसा खरडून कोणावर आरोप करतील ?
हेही वाचा…भाजप शिंदे गटाला देणार झटका, नारायण राणे रत्नागिरी- सिंधूदुर्गातून लोकसभेच्या रिंगणात
हेही वाचा…“आज एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला, तो भाजपलाच धक्का”
हेही वाचा…“अशोक चव्हाण हे दोन वर्षापुर्वीच कॉंग्रेस सोडणार होते, पण…. कुणी केला हा दावा ?