मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीकरिता भाजपकडून तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी तसेच डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. यातच अजित पवार गटाकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर खोचक टिप्पणी केली आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रात कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर, कॉंग्रेसने पुन्हा लंगड्या उमेदवारावर डाव टाकला
काल अजित पवार गटाची राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राज्यसभेसाठी सुनील तटकरे तसेच समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाली. तर पार्थ पवारांना देखील राज्यसभेवर पाठवण्यात यावे, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी जोरात लावून धरली. यावर बोलतांना रोहित पवारांनी संताप व्यक्त केला. राज्यसभेवर अभ्यासू लोकांना पाठवलं जातं. पार्थ पवार हे त्या पद्धतीचे उमेदवार आहेत. एखादा विचारवंत राज्यसभेवर गेल्याने जर राज्याच्या आणि देशाचा फायदा होईल.असं जर अजित पवारांना वाटत असेल तर ते पार्थ पवारांना पाठवतील. हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे. असा टोला रोहित पवारांनी लगावला.
हेही वाचा…“शरद पवार आपला पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करणार का ?” शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
दरम्यान, येत्या २८ फेब्रुवारी रोजी ६ जागांसाठी राज्यसभेसाठी निवडणुक होत आहे. यामध्ये तीन जागा भाजप, तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने राज्यसभेसाठी चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोण आहेत डॉ. अजित गोपछडे ? भाजपकडून राज्यसभेसाठी ‘तीन’ उमेदवार मैदानात
हेही वाचा…शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून अनेपक्षित उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
हेही वाचा…राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी, भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर
जरांगे पाटलांनी लोकसभेची निवडणुक लढवावी, मतदारसंघही ठरवला, कुणी दिला हा सल्ला ?
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झालाय,” नारायण राणे मनोज जरांगे पाटलांवर संतापले