मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. मानेच्या आणि पाठीच्या शस्त्रक्रियेमुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वर्षा बंगल्यावर आराम करत होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठणठणीत बरे झाले आहेत आणि विरोधकांवर त्यांनी टीकांचे बाण मारण्यास सुरुवात केली आहे.
महावितरणाविरोधात आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता सक्रिय झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचा खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे अशाच आजारपणातून गेले होते, तेव्हा शिवसेना आणि मित्रपक्ष या नात्याने आम्ही त्यांची काळजी घेतली होती. सध्याचे भाजप नेते मात्र आम्हालाच टोले मारण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दर्शन झाल्याने राज्यातील जनता सुखावली आहे. विरोधी पक्ष भाजपमध्ये एक प्रकारची नरमर्दानगी आलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी असताना त्यांच्यावर जहरी टीका करणाऱ्यांच्या मनात किती घाण आहे हे आज उघड झाले आहे.
महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने नेहमीच आपलं मन मोठं करून सगळ्यांना भरभरून दिलेलं आहे. मात्र आजचा विरोधी पक्ष हे सर्व काही विसरला आहे. सध्या भाजप हे अत्यंत कोत्या मनाचं झालं असून त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा करणं हे अत्यंत चुकीचं आहे. नामर्दानगी हा शब्द माझा नक्कीच नाही. मागील दोन दिवसांपासून भाजपच्या काही नेत्यांकडून हा शब्द वारंवार ऐकल्यामुळे तो शब्द मी उच्चारत आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी केलेली प्रार्थना ही कोणत्या टोकाची होती हे सगळ्यांनाच कळत आहे. पश्चिम बंगालच्या तीन महत्वाच्या व्यक्तींनी पद्म पुरस्कार नाकारला आहे अशी माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे.
Read also:
- ‘ज्यांना लुडबुड करायची असेल त्यांना करू द्या, म्हापश्याचे भवितव्य हे आमचे म्हापशेकर ठरवतील’
- आयोगाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यायला लावा अन्यथा गंभीर परिणाम; पडळकरांचा सरकारला इशारा
- पहिले तुम्ही छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव मंजूर करा; उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा
- ‘लोबो यांना आम्ही मंत्री केले मात्र मंत्रिपदाचा योग्य वापर ते विकासासाठी करू शकले नाहीत’
- राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून उघडणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती