पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यातच महायुतीने मिशन ४५ जागा जिंकण्याचा संकल्प ठेवला आहे. तर राज्यात चाळीस पेक्षा अधिक जागा जिंकणार असा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. यानिवडणुकीत मनसेने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. परंतु लोकसभेची निवडणूक लढणार असं सांगितलं आहे. यातच आता राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी १४ जागांवर उमेदवारांची चर्चा सुरू आहे. त्याची यादी देखील समोर आली आहे.
हेही वाचा…२२ जानेवारीला कोण कोण जाणार ? कुणाला निमंत्रण ? उद्धव ठाकरे २२ जानेवारीला काय करणार ?
लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघापैकी १४ मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यावर अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत. यामध्ये कल्याण लोकसभेमधून राजू पाटलांचं नाव समोर आलं आहे. तर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर, दक्षिण मध्य मुंबईतून नितीन सरदेसाई, ईशान्य मुंबईतून संदीप देशपांडे, उत्तर मध्य मुंबईतून संजय तुर्डे, उत्तर मुंबईतून गजानन राणे, उत्तर पश्चिम मुंबईतून वागीश सारस्वत यांच्या नावांची चर्चा आहे.
हेही वाचा…घरात एकत्र जेवण केलं अन् बाहेर काढला काटा ; शरद मोहोळच्या ह’त्ये’चा’ सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
दरम्यान, ठाण्यातून अभिजित पानसे, बारामतीतून सुधीर पारस्कर, सोलापूरातून दिलीप धात्रे, चंद्रपुरातून राजू उंबरकर, नाशिकमधून डॉ. प्रदीप पवार, पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे किंवा साईनाथ बाबर,रायगडमधून वैभव खेडेकर,यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे राज ठाकरे यावर काय निर्णय घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..मावळात पार्थ पवार तर शिरूरमधूनही आपला उमेदवार असणार, मग शिंदे जाहीर सभा का घेताहेत? अजित पवार म्हणाले….
हेही वाचा…तळ कोकणात जागावाटपावरून महायुतीत राजकीय शिमगा ; सिंधूदूर्ग-रत्नागिरी लोकसभेवरून मोठी रस्सीखेच
हेही वाचा“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
हेही वाचा“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मयतासोबतच आरोपींचा २५ दिवसांपासून वावर, कट रचला अन्..” शरद मोहोळ ह’त्या’प्रकरणी पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती