पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वंशवाद संपवण्याचं ठरवलं आहे. पंरतु मोदींनी जरी ठरवलं तरी मला ते संपवू शकत नाही. असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“खडसे, तावडे, मुंडेंनंतर आता फडणवीस गिरीश महाजनांचाही राजकीय काटा काढणार”?
आज पत्रकार परिषदेमध्ये किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर निशाणा साधला. मी पंकजा मुंडेंवर बोलणार नाही. कारण त्यांच्या जन्माच्या आधीपासून त्यांचे वडिल, आजोबा, काका, भाऊ असं सगळं कुटुंबच राजकारणात मुरलेलं आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंकडून राजकारणाचं बाळकडून घेतलं आहे. पंकजा मुंडे स्पष्ट आण कार्यशील महिला आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षातली खदखद बोलून दाखवली. स्वत: च्या बाळाला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याच्या बाळाला मांडीवर घेऊन खाऊ-खाऊ पिऊ घालून गुटगुटीत करण्याचा देशात ट्रेंड दिसतोय. त्याला पंकजा मुंडेंनी वाचा फोडली आहे.
“माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
राज्यात आता ग्रामपंचायत आणि इतर निवडणुका सुरू होत आहेत. आता या निवडणुका आपण वेगळ्या पद्धतीनं लढुया. आपल्याला जातपात, पैसा, प्रभाव याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे. मात्र मला कोणी संपवू शकत नाही. मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करू शकणार नाहीत असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.
“मोदींनी जरी ठरवलं तर ते मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेच्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ
दरम्यान, महाराष्ट्र भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्या लोकप्रियतेची बरोबरी करणारे नेतृत्व आहे. हे सत्य नेमके कुणाला रूचत नाही. ? माझ्या व त्यांचे पक्ष, विचार वेगळे आहेत पण कट, कारस्थानावेळी महिला म्हणून त्यांच्या पाठीशी आहे. असं मत राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also
- बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली, हा मंत्रीपद न मिळल्याचा राग आहे का?
- अन् बच्चू कडूंनी थेट कार्यकर्त्यांच्याच कानशिलात लगावली..! व्हिडीओ व्हायरल
- “बिहार पेक्षा वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात भाजपने करून ठेवलीय”
- “निवडणुक आयोगावर कुठेही शिंतोडे उडणार..;” शिवसेना प्रकरणावर आंबेडकरांची प्रतिक्रिया
- केंद्र सरकारकडून पीआयएन संघनेवर पाच वर्षाची बंदी..! सोमय्यांनी थेट फंडींगचं कनेक्शन जोडलं