नाशिक : नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा विसर पडायला का? असा सवाल उपस्थित होत आहे. याचं कारण म्हणजे शिवसेनेने लावलेल्या होर्डिंगवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचाच फोटो नसल्याचं दिसून आलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते बिटको रुग्णालयाचे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नामकरण करण्यात आले. या रुग्णालयाच्या समोरच शिवसेनने मोठे होर्डिंग्ज लावले आहेत त्यात बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांच्यांसाह नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची छबी आहे. स्वतः नाशिकरोडचे सभापती प्रशांत दिवे यांची ही मोठी छबी आहे मात्र मुख्यमंत्रीची छबीच दिसत नाहीये.
राज ठाकरे यांची तब्येत बिघडली; मनसेचे मुंबई, पुण्यातील मेळावे अचानक रद्द
विशेष म्हणजे रुग्णालयाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं आहे. मात्र कार्यक्रमाला महापौर, आयुक्त यांची ही अनुपस्थिती राहिली. याबाबत या कार्यक्रमाचे निमंत्रक प्रशांत दिवे यांना विचारले असता त्यांनी हा होर्डिंग महापालिकेने लावला असल्याचं उडवा उडवीच उतरत देत या प्रकरणी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
सरकारच्या जीआर’ वर औरंगाबाद’च्या अगोदर संभाजीनगर; नामकरणाचा वाद पुन्हा पेटणार?
आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिकमध्ये दोन दिवस विविध विकासकामांचे उद्घाटन व शिवसैनिकांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संजय राऊत म्हणाले, विकास कामे म्हणजे काय तसेच इथले शिवसेनेचे नगरसेवक काय करू शकतात हे नाशिकमध्ये आल्यावर समजले. यंदा नाशिकमध्ये शिवसेना सत्तास्थानी राहणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच कामाच्या माध्यामतून आपल्याला लोकांपर्यंत पोहचावे लागेल. ही कामे म्हणजेच शिवसेनेची ओळख असल्याचे राऊत यांनी सांगितले नाशिक महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर असून, ‘मिशन महापालिके’चा भाग म्हणून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत नाशिकच्या मैदानात उतरले आहेत.
Read Also :
- पिंपरी चिंचवडमधील 700 कोटीच्या भ्रष्टाचारात भाजप आमदाराच्या कंपनीचा हात; संजय राऊतांचा दावा
- सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? गोपीचंद पडळकरांचा राऊतांवर हल्लाबोल
- एक एकर शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी द्या; शेतकऱ्याच पत्र
- वाटोळ करायचं अन् मी नाही… मी नाही… काही केलं म्हणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे; उदयनराजे संतापले
- तक्रारदार तक्रार करून गायब झाला, कुठे गेला माहित नाही, पण केस सुरू आहे; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी