मुंबई : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम हे चर्चेत आले होतो. अनिल परब यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज्यात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यासाठी कदम विधानभवनात जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवले आहे. त्यामुळे कदम यांना विधिमंडळाच्या गेटवर काही काळासाठी ताटकळत उभं राहावं लागले. राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याने रामदास कदम यांना विधिमंडळाच्या गेटवरच अडवले का? अशी चर्चा सुरु झाली.
…तर मलाही सभागृहाच्या बाहेर काढा; विधानभवनात अजित पवारांचा संताप
कोरोनाचे संकट पाहता हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने काही नियमावली लागू केली आहे. केवळ आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्यात येत आहे. त्याचसोबत गर्दी होऊ नये म्हणून स्वीय सहाय्यकांना विधिमंडळाबाहेर उभारण्यात आलेल्या शेडमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली नाही त्या कारणाने पोलिसांनी त्यांना थांबविले.
…तर मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन – जितेंद्र आव्हाड
गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम आणि शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार आहेत असा आरोप पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी केला होता. शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक म्हणून १९७० पासून पक्षासाठी निष्ठेने काम करत आहे . कोकणातील काही राजकीय पुढाऱ्यांना माझी अडचण होत असल्यामुळे ते माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत . आम्हा जुन्या नेत्यांना मंत्री पद दिले नाही त्याचे कुठे ही दु:खं नाही. पक्षाने मला पुष्कळ काही दिले आहे.याचदरम्यान कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणाही साधला होता.
राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याला हाताशी पकडून मला कोकणातून संपवण्याचं राजकारण करत आहे का? असा प्रश्न कदमांनी उपस्थित करत अप्रत्यक्षपणे अनिल परब यांना टोला लागला होता.
Read also:
- अजित पवारांनी काल विधानसभेत चपराक लगावून सुद्धा एकनाथ शिंदेनी केली गडबड..
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्लीन चीट द्यायचे, ते स्वत:ला न्यायाधीश समजायचे – नाना पटोले
- भाजपाच्या प्रियांका बारसे ‘भरभरुन हसल्या’ अन् राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणेंच्या ‘अडचणी वाढल्या’!
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे निश्चित?
- विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का? फडणवीसांचा रोखठोक सवाल