मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांनी निशाणा साधत त्यांनी दुसऱ्या मंत्र्याकडे पदभार द्यावा अशी मागणी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे पदभार द्यावा असा सल्ला दिला. मात्र यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर विश्वास नसावा असा टोलाही लगावला. विरोधकांच्या या टीकेवर जितेंद्र आव्हाड यांनी मात्र नाराजी व्यक्त करत सुनावलं होतं. दरम्यान यावरुन चंद्रकांत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे.
बुधवारी दुपारी विधानसभेच्या सदनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना आव्हाड यांना मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन सुरु असणाऱ्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आव्हाड यांनी, “विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नसल्याचं उदाहरण आहे. कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अर्धा, पाऊण तास बोलत होते,” असं सांगितलं.
मनसेला मोठं खिंडार: औरंगाबादेतील तब्बल 53 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी राजीनामे
पुढे बोलताना, “मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही विभागाची जबाबदारी नाहीय. ते संपूर्ण मंत्रीमंडळाचे नेते आहेत. जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवानामध्ये येणार. ते अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानभवनात येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं चुकीचं आहे. आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो काय? आपली ती संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. तो काय स्वत:हून नाटक करत नसतो. त्यामुळे या आजारपणाची चर्चा करणं हेच मला मुळात विकृतपणाचं, बालिशपणाचं लक्षण आहे,” अशा शब्दांमध्ये आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
Read also:
- …तर मलाही सभागृहाच्या बाहेर काढा; विधानभवनात अजित पवारांचा संताप
- ओबीसींच्या जनगणनेसाठी वंचित बहुजन आघाडीचा विधानभवनावर मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
- मुंबईत नितेश राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; ‘त्या’ ट्वीट विरोधात काळाचौकी पोलिसांत तक्रार
- अनिल परब आणि नितेश राणेंमध्ये सभागृहात हमरीतुमरी; फडणवीसांच्या मध्यस्तीनंतर वाद मिटला
- मुश्रीफ-घाटगे संघर्षाला समझोत्याने ब्रेक; कार्यकर्ते ‘या’ सेटलमेंटच्या राजकारणातून धडे घेणार का ?