कोल्हापूर : मागील काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदीता माने, खासदार धैरशील माने, समरजितसिंह राजे घाटगे, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि इतरही दिग्ग्ज नेत्यांनी जिल्हा बँकेकरिता एकमेकांच्या सोबत तर काहींनी विरोधात शड्डू ठोकले होते.
…तर महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच मोठं वक्तव्य
समरजितसिंह राजे घाटगे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गट यांच्यातील संघर्ष हा संपूर्ण कोल्हापूरला ज्ञात आहे. असं असताना आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू कारखान्यासाठी आपल्या गटाकडून जोरदार तयारी केली होती.
…तर महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच मोठं वक्तव्य
शाहू कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी सलग तीन वर्ष सर्वसाधारण सभेला हजेरी महत्त्वाची आहे आणि मुश्रीफ यांनी हा निकषही पूर्ण केला होता. तीन वर्षांनंतर आता संघर्ष सुरु होणार असं वाटत असताना थेट समझोता एक्सप्रेस धावल्याने घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाला ब्रेक लागला आहे. जिल्हा बँकेत मुश्रीफ यांना शह देण्यासाठी राजे गटाकडून कागल तालुका विकास संस्था गटात राजे गटाचे समर्थक बाबासाहेब हिंदूराव पाटील यांचा अर्ज दाखल केला होता. त्याच प्रमाणे राजे गटाला शह देण्यासाठी श्रीफ यांचे कट्टर समर्थक नेताजी मोरे यांच्यासह अन्य तिघांचे अर्ज दाखल झाले होते.
पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे आणि जगदाळे बिनविरोध..!
मात्र ऐन मोक्यावर मुश्रीफ घाटगे यांच्यात समझोता झाल्याने दोन्ही बाजुंनी संघर्ष थांबण्यात आला. सर्वप्रथम पाटील गटाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतला तर दुसरीकडे मुश्रीफ गटाने अर्ज माघारी घेतले. त्यामुळे शाहूचीही निवडणूक बिनविरोध झाली. या नेत्यांच्या कार्यकर्त्यांत टोकाचा संघर्ष आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची झलक अनेकदा पहायला मिळत असते. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने या दोघांत धावलेल्या समझोता एक्सप्रेसमुळे कार्यकर्त्यांनी काय धडा घ्यायचा? हा प्रश्न आहे.
Read also:
- मनसेला मोठं खिंडार: औरंगाबादेतील तब्बल 53 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी राजीनामे
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होऊन प्रचाराला सुरुवात; जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज नेत्यांचा कस लागणार
- फडणवीसांनी मागतिलेला ‘१५ लाखांचा’ पुरावा सत्यजित तांबेनी दिला; मोदींचा ‘तो’ व्हिडीओच समोर आणला
- माजी मंत्री अनिल राठोडांच्या पुत्रास विधानसभेच्या उमेदवारीवरून जीवे मारण्याची धमकी; अहमदनगर शहरात खळबळ
- “हे सरकार घाबरलेलं…”; विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात