अहमदनगर : अहमदनगर शहरात गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेचा एकहाती बोलबाला पालिकेवर आणि विधानसभा क्षेत्रावर होता. याचे मुख्य कारण म्हणजे दिवंगत अनिल भैय्या राठोड यांचं कट्टर नेतृत्व. हिंदुत्ववादी विचारांना सोबत घेणारा नेता म्हणजे अनिल भैय्या असं समीकरण नगर शहरात असल्याने सलग पाच विधानसभा निवडणुकीमध्ये राठोड यांचा शहरावर बोलबाला राहिला.
हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची पहिलीच मागणी अजित पवारांनी केली मान्य..
कोरोनाच्या महामारीत राठोड यांचे निधन झाले. त्यानंतर सर्व सूत्र शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी हातात घेतली. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आघाडीवर राहून प्रचार करत होते. विक्रम राठोड हे सध्या पक्षवाढीचं काम जोरदार करत आहेत. असं असल्यामुळेच काल अज्ञात व्यक्तीने त्यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठविले आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात युवा नेते विक्रम राठोड यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या पत्रात धमकी दिली आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी करू नको, कारण तुझ्या बापाने नगरचा कधीच विकास केला नाही. तू तरी काय करणार. असे म्हणत शिवसेना कार्यकर्ते व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे.
अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील – गोपीचंद पडळकर
या पत्रात पुढे म्हटले आहे की, संग्राम भैय्यांच्या निवडणुकीत पडला तर तुझ्या सकट सगळ्यांचा काटा काढू. असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. आमदार संग्राम जगताप हे अहमदनगरचे विद्यमान आमदार आहेत. राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरी नगरमध्ये या पॅटर्नला तडा गेलेला आहे.
Read also:
- “हे सरकार घाबरलेलं…”; विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात
- पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे आणि जगदाळे बिनविरोध..!
- …तर महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच मोठं वक्तव्य
- फडणवीसांच्या मनात ‘ती’ सल असल्यामुळेच मला माफी मागायला लावली – भास्कर जाधव
- “..अशा धंद्यांमुळे पुढच्या निवडणुकीत हे नक्की पडतील”, नक्कल प्रकरणावरुन मुनगंटीवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा