मुंबई : महाराष्ट्रात प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नुकत्याच सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आत सगळ्यांच्याच चिंतेत अधिक भर पडली आहे. याचबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘या’ सहकाऱ्याची ईडीकडून तब्ब्ल ८ तास चौकशी
‘असं लवकरच होऊ शकतं की, जर रुग्ण सातत्याने वाढत राहिले तर सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं.’ असं महत्त्वाचं विधान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
Maharashtra | If Omicron cases continue to rise, we may take a call to shut the schools again. We are monitoring the situation: School Education minister Prof. Varsha Eknath Gaikwad to ANI
(file photo) pic.twitter.com/9EDsOuAnw3
— ANI (@ANI) December 22, 2021
देशातील एकूण 224 ओमिक्रॉन केसेसपैकी 65 महाराष्ट्रातील आहेत. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचे सर्वाधिक 57 रुग्ण आहेत. ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिली क्रमांकावर आहे. यामुळेच राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ‘ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत राहिल्यास आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.’
नुकत्याच राज्यात शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मुंबईत तर 16 डिसेंबरपासून प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्रात 2022 बोर्डाच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या धोक्यामुळे शाळा बंद राहिल्यास मुलांच्या शिक्षणाला फटका बसण्याची खात्री आहे. अशावेळी पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 65 रूग्ण कुठे-कुठे आहेत?
मुंबई – 30
पिंपरी-12
पुणे ग्रामीण- 7
पुणे महापालिका-3
सातारा- 3
उस्मानाबाद- 3
कल्याण डोंबिवली- 2
बुलढाणा-1
नागपूर-1
लातूर-1
वसई विरार-1
नवी मुंबई -1
एकूण-65
Read also:
- फडणवीसांच्या मनात ‘ती’ सल असल्यामुळेच मला माफी मागायला लावली – भास्कर जाधव
- “..अशा धंद्यांमुळे पुढच्या निवडणुकीत हे नक्की पडतील”, नक्कल प्रकरणावरुन मुनगंटीवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
- अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील – गोपीचंद पडळकर
- एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था शेतकऱ्यांसारखी झालीय, कामगार आत्महत्येच्या मनस्थितीत – गुणरत्न सदावर्ते
- विधानसभेत उडाल्या `क्राॅस कनेक्शन`च्या ठिणग्या; नितीन राऊतांना टार्गेट करताना पटोलेंनी दिली फडणवीसांना साथ