मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने एक मोर्चा काढलेला आहे. सध्या पोलीस या मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलीस आणि मोर्चेकरी आमनेसामने आले आहेत. ओबीसी जातीनिहाय जनगणना व्हावी, राज्यातलं आरक्षण वाचलं पाहिजे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे आणि जगदाळे बिनविरोध..!
विधानभवनावर आलेल्या या मोर्चादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची मागणी कोर्टात लावून धरली नाही. म्हणून ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे. म्हणून हा मोर्चा काढण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था पाहणं ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती घ्यावी. आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे, ते सुरू राहणार. कारण तो आमचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं तरी आमचं आंदोलन सुरू राहणार आहे.
“हे सरकार घाबरलेलं…”; विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, शासनाला योग्य रितीने निर्णय घेता यायला हवा. आत्ता साडे चारशे कोटीची तरतूद केली आहे. पण त्यासाठी जनगणना करणारा कायदा राज्य शासनाकडे कुठे आहे? अधिवेशनात तो कायदा केला पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाने तो मागितलेला आहे. तो कायदा केला आणि जनगणना समितीकडे हे पैसे वळवले तर ही समितीच ओबीसी जनगणना करून सर्वोच्च न्यायालयाकडे अहवाल देईल. पण या सरकारचा हेतू खोटा आहे. ज्याप्रमाणे त्यांनी गरीब मराठ्यांचं आरक्षण संपवलं तसंच ते ओबीसींचंही संपवत आहेत.
फडणवीसांनी मागतिलेला ‘१५ लाखांचा’ पुरावा सत्यजित तांबेनी दिला; मोदींचा ‘तो’ व्हिडीओच समोर आणला
या आंदोलना दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात गोंधळ झाला आहे.
Read also:
- मुंबईत नितेश राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; ‘त्या’ ट्वीट विरोधात काळाचौकी पोलिसांत तक्रार
- अनिल परब आणि नितेश राणेंमध्ये सभागृहात हमरीतुमरी; फडणवीसांच्या मध्यस्तीनंतर वाद मिटला
- मुश्रीफ-घाटगे संघर्षाला समझोत्याने ब्रेक; कार्यकर्ते ‘या’ सेटलमेंटच्या राजकारणातून धडे घेणार का ?
- मनसेला मोठं खिंडार: औरंगाबादेतील तब्बल 53 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी राजीनामे
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होऊन प्रचाराला सुरुवात; जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज नेत्यांचा कस लागणार