मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. मागील काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज आठ दिवस होत आहेत. त्यामुळे राज्यातील मराठा समाज सरकारच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण घालवलं,” भाजपचा जोरदार पलटवार
एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत सर्वपक्षीयांची मतं जाणून घेतली जाणार आहे. शिंदे समितीनं सादर केलेला अहवाल सर्वपक्षीय बैठकीत मांडला जाणार आहे. सरकार शिंदे समितीच्या अहवालाबाबत सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार आहे.याचसोबत कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देण्यासाठी उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणार असून कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार सहकार्याचं आवाहनही करणार आहे.
हेही वाचा…बीड जाळपोळीच्या घटनेबाबत मोठी कारवाई होणार, फडणवीसांनी पोलिसांना दिले आदेश
दरम्यान, राज्यातील सर्वच पक्षाचे नेते सह्याद्री अतिथी गृहावर दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींनाही वेग वाढला आहे. त्यामुळे पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या बैठकीत आता काय निर्णय लागणार ? त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बीडच्या घटनेत ३४ आरोपींना अटक..! “तर बीडला येईल आणि मराठे काय असतात ते कळेल”, मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…“शिंदे समितीचा अहवाल प्राथमिक असून अजून काम करणं बाकी”, मराठा आरक्षणाला अजून वेळ लागणार ?
हेही वाचा…“घर जळत होतं, तेव्हा मुल देवा घरात हात जोडून होती,” क्षीरसागर कुटुंबीयांनी सांगितला धक्कादायक अनुभव
हेही वाचा…“जाळपोळ झाली तेव्हा घरात होतो, काही लोकांनी ठरवून जाळपोळ केली”, योगेश क्षीरसागरांनी दिली प्रतिक्रिया
हेही वाचा…प्रवेश बंदी असताना आलेल्या आमदार विश्वजीत कदम यांना पाठवलं माघारी