मुंबई: राज्याचे विधिमंडळ, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते हे देखील याच लोकशाही व्यवस्थेचे अविभाज्य भाग आहेत आणि तेही घटनात्मक मार्गानेच त्या पदावर आहेत, याचं विस्मरण होऊ देऊ नका, असा खोचक टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना लगावला.
हे पण वाचा: आठवडा उलटून गेला…पूरग्रस्तांसाठी पॅकेज कधी? अजित पवारांनी केले भाष्य
शिवसेनंच मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मध्ये विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या कोकण दौऱ्यावर ‘पर्यटन दौरा’ म्हणून टीका करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ‘आम्हीही लोकशाहीचे अविभाज्य भाग आहोत, लोकशाहीचे थट्टा करु नका, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी राऊतांना उत्तर दिलं.
हे पण वाचा: “पंडित नेहरुंबद्दल प्रचंड आदर, पण…”, राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने खळबळ
ज्यावेळी कोकणातील भीषण पूरपरिस्थितीबाबत मला माहिती मिळाली तेव्हा मुंबईत थांबणे मला प्रशस्थ वाटले नाही. त्यामुळे तातडीने मी सहकाऱ्यांसह कोकणाकडे धाव घेतली. फक्त याच वेळी नाही तर निसर्गसारख्या संकटात देखील त्याच रात्री मी कोकण गाठलं होतं. आपत्तीत धावून जाणं, मदत करणं, मदतीसाठी प्रयत्न करणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
हे पण वाचा: “पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत शरद पवारांचा सल्ला योग्यच पण…”, पवारांच्या आवाहानाला फडणवीसांचं उत्तर
लोकशाहीची थट्टा करणे योग्य नाही, दरेकर संतापले
हे पण वाचा: पूरग्रस्त भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांना, पवारांनी केले कळकळीचे आवाहन
घटनास्थळी जाऊन लोकांना धीर देणं, सरकार आणि विरोधी पक्ष एकत्रितपणे या संकटाशी मुकाबला करीत आहेत. हा विश्वास निर्माण करणं, प्रशासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेणं आणि त्रुटी सरकारच्या निदर्शनास आणून देणं, हे विरोधी पक्ष नेते पदाच्या कर्तव्याचा एक भाग आहे, त्याला पर्यटन संबोधून लोकशाहीची थट्टा करणे योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.
Read Also :
- कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज, ६ जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
- कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; २ जण गंभीर जखमी
- “पंडित नेहरुंबद्दल प्रचंड आदर, पण…”, राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने खळबळ
- “पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत शरद पवारांचा सल्ला योग्यच पण…”, पवारांच्या आवाहानाला फडणवीसांचं उत्तर
- पूरग्रस्त भागाशी संबंध नसलेल्या नेत्यांना, पवारांनी केले कळकळीचे आवाहन