मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादीवर भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर देखील टिका करण्यात आली. यातच आता काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यानंतर पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने रान पेटलं, शरद पवारांचं प्रत्युत्तर तर नाना पटोले
पृथ्वीराज चव्हाण यांचं त्यांच्या पक्षातील स्थान काय आहे, हे आधी त्यांनी तपासून पाहावं. असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. तसेच ते ए आहेत की बी, की सी,डी आहेत. ते आधी त्यांनी तपासून पाहावं. त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना विचारलं तर ते त्यांना खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“१६ आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे”, विधानसभा अध्यक्ष
शरद पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे. ते बोलले तरी मला त्याचं काही वाटत नाही. मी बरचं काही सहन केलेलं आहे. शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार आहे. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी मजबुत व्हावी. कुणीतरी मंत्री व्हावं. कुणालातरी पद मिळावं यासाठी महाविकास आघाडी झालेली नाही. भाजपचा विषारी विस्तार थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या प्रयत्नांना कुणीही अपशकुन करू नये. अशी माझी प्रामाणिक भावना आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“सकाळचा भोंगा रोज बघतो, पण त्या भोंग्यावर मला जायचं नाही”, श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टिका
हेही वाचा…“संजय राऊत आता शरद पवारांनंतर राहुल गांधींची चाकरी करताहेत”
हेही वाचा…“अनेकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचे चॉकलेट पुन्हा दाखवण्यात येतील”
हेही वाचा…..“अजित पवारांची हवी निघालीय, त्यांची ओळख त्यांच्या काकांमुळेच”
हेही वाचा…पुणे शहाराध्यक्ष बदलणार? भाजपची पुण्यातील कार्यकारिणीत बदल, कुणाला संधी ?