पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान होत आहे. त्यानंतर ११ आणि १२ मे हे दोनच दिवस न्यायमुर्ती एम. आर. शहा सर्वाच्च न्यायालयात कामकाजात असणार आहे. त्यानंतर ते १५ मे रोजी निवृत्त होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल हा ११ किंवा १२ मे रोजी लागण्याची शक्यता आहे. असं वकिल असीम सरोदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या एक ते दीड वर्षापासून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“आमचं बोलणं थेट ठाकरेंशी असतं, त्यामुळे राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही” नाना पटोले
आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे ही एक मोठी शक्यता सोप्या निर्णयाचा भाग म्हणून जास्त आहे. गव्हर्नर भगत कोशियारी यांनी जो आदेश काढून फ्लूअर टेस्ट घ्या, विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश काढला तो काढण्याचा त्यांना अधिकारच नव्हता. राज्यपालांनी बहुमतचाचणीचा दिलेला आदेश रद्द ठरवला जाऊ शकतो. त्याचबरोबर पक्षविरोधी कारवाया केल्या असे म्हणून 16 आमदारांना थेट स्वतःच अपात्र ठरविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घटनेतील कलम 142 चा वापर करून घेईल कारण बहुमत चाचणी आदेश ही राज्यपालांची कृतीच घटनाबाह्य असल्याने ती रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत. अशीही शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…भाजपने फौजदाराचा हवालदार केलाय, त्यांनी आमची मापं काढावी का? जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल
तसेच एक धूसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे 10 व्या परिशिष्टा संदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते. ही शक्यता धूसर आहे व तसे होणार नाही असे वाटते. असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर वरील शक्यता या संविधानातील तरतुदींनुसार व्यक्त केल्या जाऊ शकतात. निवडणूकपूर्व युती किंवा आघाडी करणे आणि निवडणुकी नंतर इतर कोणत्या पक्षासोबत आघाडी करणे याबाबत कायदा नाही. त्यामुळे त्यावर सुप्रीम कोर्ट खूप काही व्यक्त करणार नाही. परंतु निवडणूकपूर्व युती किंवा आघाडी करणे आणि निवडणुकी नंतर ती युती तोडणे ही अनैतिक कृती मतदारांची फसवणूक आहे व असा कोणताच कायदा नसल्याचा सगळ्या पक्षांनी गैरफायदा घेतला आणि सर्वाधिक गैरफायदा भाजपने घेतला आणि भारतात अनेक राज्यात असे अनैतिक मार्गाने सरकार स्थपन केले आहेत.
हेही वाचा…“संजय राऊतांना राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं वाटतं का ?”
पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भांत सगळ्यात क्लिस्ट अशी घटनात्मक गुंतागुंत निर्माण करणारी ही केस असल्याने महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा असेल. नवीन संवैधानिक नैतिकता प्रस्थापित करण्याची मोठी संधी सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि मतदारांच्या तर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करून घेऊन मतदारांचे म्हणणे सुद्धा अश्या प्रकरणी ऐकून घेतले जाऊ शकते हा आधुनिक पायंडा या केसमधून निर्माण झाला आहे. निकाल एकमताने दिलेला नसेल हे नक्की व त्याबाबतचे माझे निरीक्षण/विश्लेषण नंतर करेन. असंही असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
#महाराष्ट्रसत्तासंघर्ष प्रकरणी निकाल 11 किंवा 12 मे 2023 ला लागेल.
निकाल काय असेल याबाबत केवळ काही कायदेशीर शक्यता व्यक्त करता येऊ शकतात.
1.आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे ही एक मोठी शक्यता सोप्या निर्णयाचा भाग म्हणून जास्त आहे.— Asim Sarode (@AsimSarode) May 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांनी दोन वेळा नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फसवलं”
हेही वाचा…महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष..! 11, 12 मे ला निकाल लागणार? काय निकाल लागणार? असीम सरोदेंनी केली ‘ही’ शक्यता
हेही वाचा…““कर्नाटक अन् केंद्रातील सत्ता गेल्यानंतर नरेंद्र मोदी देखील तुरूंगात जातील”
हेही वाचा…“मिशन मुंबई पालिकासाठी भाजपचं ‘मिशन १५०’ साठी जोरदार फिल्डिंग”, भाजप कार्यकारिणीत मोठे बदल ?
हेही वाचा…“देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आलीय” शरद पवार