पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान होत आहे. त्यानंतर ११ आणि १२ मे हे दोनच दिवस न्यायमुर्ती एम. आर. शहा सर्वाच्च न्यायालयात कामकाजात असणार आहे. त्यानंतर ते १५ मे रोजी निवृत्त होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल हा ११ किंवा १२ मे रोजी लागण्याची शक्यता आहे. असं वकिल असीम सरोदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या एक ते दीड वर्षापासून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“संजय राऊतांना राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं वाटतं का ?”
पाच न्यायधीशांच्या घटनापीठामधील एक जण निवृत्त होत असेल तर हा निकाल लवकरच लागणार आहे. कारण सत्तासंघर्षाच्या निकालावर शहा यांची सही आणि त्यांचं अस्तित्व अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ११ किंवा १२ मे रोजी निकाल लागणे अपेक्षित आहे. तसेच सर्वोच्च न्यायलय निकाल देण्याआधी एक दिवस सांगणार असून ते १० तारखेला सांगण्याची शक्यता आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“१६ आमदाराचं प्रकरण माझ्याकडे आल्यास आमदार अपात्र”, नरहरी झिरवाळ
घटनात्मक गुंतागुंतीचं पेच निर्माण झालेलं प्रकरण म्हणून पक्षांर्तगत प्रकरण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण पाहिलं जात आहे. यापुर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात घटनाबाह्यात पक्षांतर्गत बंदी कायद्याच्या बाबतीत झालेली नव्हती. त्यामुळे हा निकाल महाराष्ट्रासाठी नाहीतर संपुर्ण पक्षांतर्गत बंदीच्या कायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे.
हेही वाचा…“तो गब्बर श्रीमंत झाला, अन् माझा कोकणी माणूस तसा राहिला”, राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?
या प्रकरणात न्यायालयत असं म्हटलं जाईल की, यामध्ये संविधानिक दृष्टीकोनातून विधानसभा आणि न्यायालय यामध्ये एक संविधानिक रेषा आखण्यात आली आहे. त्यामुळे सेपरेशन तत्त्वानुसार त्यांच्या कामामध्ये आम्ही लुडबुड करू शकत नाही. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांनी हा प्रश्न सोडवावा. त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवलं जाऊ शकतं. नरहरी झिरवळ असतांना हे प्रकरण घडलं. त्यावेळी ते उपाध्यक्ष असतांना ते अध्यक्षांचा कारभार पाहत होते. आता राहुल नार्वेकर अध्यक्ष आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कुणाकडे पाठवावे, असा प्रश्न निर्माण होणार. यासंदर्भात देखील निर्णय घेतांना सर्वोच्च न्यायालयाला मोठं स्पष्टिकरण द्यावं लागणार आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकरांकडे प्रकरण सोपवल्यास ते किती दिवस याबाबत निर्णय घेऊ शकतो. त्याचा अधिकारा त्यांच्याकडे असल्याचंही त्यांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…““कर्नाटक अन् केंद्रातील सत्ता गेल्यानंतर नरेंद्र मोदी देखील तुरूंगात जातील”
हेही वाचा…“मिशन मुंबई पालिकासाठी भाजपचं ‘मिशन १५०’ साठी जोरदार फिल्डिंग”, भाजप कार्यकारिणीत मोठे बदल ?
हेही वाचा…“देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आलीय” शरद पवार
हेही वाचा…“आमचं बोलणं थेट ठाकरेंशी असतं, त्यामुळे राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही” नाना पटोले
हेही वाचा…भाजपने फौजदाराचा हवालदार केलाय, त्यांनी आमची मापं काढावी का? जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल