मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या विविध वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टिका केली जात आहे. यातच आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील त्यांना फाट्यावर मारलं आहे. आमचं बोलणं थेट उद्धव ठाकरेंशी असतं त्यामुळे संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी उमेदवारांना विजयी करा”, राज ठाकरेंचं मराठी भाषिक मतदारांना आवाहन
राज्यात काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील ३ वर्षात महाविकास आघाडीने भाजपला धुळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. महाविकास आघाडी जागा वाटपाविषयी कसलेही मतभेत नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करतील असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“वरती यशवंत चव्हाण साहेब देखील राज्याची राजकीय परिस्थिती पाहून रडत असतील”, अजित पवार
संजय राऊत हा गौण विषय आहे, आमची बोलणी थेट उद्ध ठाकरेंशी असतात त्यामुळे संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. असं नाना पटोले यांनी म्हटलं. राज्यात मागील काही दिवसापासून ज्या काही घडामोडी घडत आहेत. त्यावर विचारले असता नाना पटोले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपने फौजदाराचा हवालदार केलाय, त्यांनी आमची मापं काढावी का? जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल
हेही वाचा…“संजय राऊतांना राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं वाटतं का ?”
हेही वाचा…“१६ आमदाराचं प्रकरण माझ्याकडे आल्यास आमदार अपात्र”, नरहरी झिरवाळ
हेही वाचा…“तो गब्बर श्रीमंत झाला, अन् माझा कोकणी माणूस तसा राहिला”, राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?
हेही वाचा…“सामनात काय लिहायचं, काय नाही, हे..” राष्ट्रवादीवर केलेल्या राऊतांच्या टिकेला शिवसेनेकडून स्पष्टीकरण