सातारा : सत्ता असताना सत्तेचा माज आम्ही होऊ दिला नाही, त्याची नशा आणि मस्ती होऊ दिली नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंत्रिमंडळ चालवत होतो. तेव्हा अधिकाऱ्यांना सरकारचा धाक होता. परंतु सध्याच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार फोफवत चालला आहे. बदल्यांचे रेट ठरले जात आहे. परवा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. आमच्या वेळेस प्रशासनावर घट्ट पकड होती. पण आता ती राहिलेली नाही. अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टिका केली. ते सातारा येथे बोलत होते.
हेही वाचा…कोण पार्सल ते फडणवीसांना निपाणीत सांगणार ? फडणवीसांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील मंत्री मंत्रालयात बसत नसल्याने वेगवेगळी लोक मार्केट मध्ये बिनदास्त फिरत आहेत. उघड उघड ही माणसं लोकांना काम करून देतो असं म्हणताहेत. वर चव्हाण साहेब बघत असतील तर त्यांच्याही डोळ्यात अश्रू येत असेल. इतकं घाणेरडं राजकारण सध्या सुरू आहे. राज्यातील मंत्र्यांनी राज्यपालासह महापुरूषांबाबत बेताल वक्तव्य केलीत. त्यांना कुणी आवरलं नाही. आमच्याकाळात काही घडलं नाही. परंतु शिंदेंच्या काळात घडत असल्याची टिका ही अजित पवार यांनी केली.
हेही वाचा…“फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहण्यांपैकी, त्यांना सत्तेची लालसा”
दरम्यान, राज्यातील मागील दोन ते तीन दिवसातील राजकीय गोंधळानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आज शरद पवार सोलापुर तर अजित पवार सातारा दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही नेत्यांच्या सभा होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर जोरदार टिका करतांना दिसत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“उधारीवर ताज महल घ्यायला मला पण आवडेल”, म्हणून आव्हाडांनी सरकारवर केली टिका
हेही वाचा…“शरद पवार घटना बदलून अध्यक्ष झालेत, मग ते दुसऱ्याला अध्यक्ष कसे होऊ देतील ?” भाजपची टिका
हेही वाचा…“तेव्हा शाळेतील मुलंही म्हणू लागले की ‘आ गए गद्दार’, ” शरद पवारांनी तो किस्सा सांगत शिंदेंवर साधला निशाणा
हेही वाचा…“राऊतांना दुसऱ्याच्या घरात घुसायची गरज काय ?” भुजबळांनी संजय राऊतांना झापलं
हेही वाचा…“ठाकरेंना सांगूनही स्नेहल जगतापांना प्रवेश दिला”, नाना पटोलेंची टिका, आघाडीत बिघाडीची शक्यता ?