नाशिक : शरद पवार हे राष्टीय पातळीवरील मोठे नेते असून त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे. परंतु पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. तसेच चारेक दिवसांपुर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बांध्यापासून हादला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार या चितेंने हादरून गेला. अशी टिका संजय राऊत यांनी सामानातून केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
संजय राऊतांना आता सगळं उकरून काढायची काय गरज होती? यामुळे राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अन् त्यात मनभेद निर्माण व्हावं असं त्यांना वाटत आहे का ? असा सवाल छगन भुजबळ यांनी राऊतांना केला आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील असे अनेक नेते काम करण्यास समर्थ आहेत. असंही त्यांनी राष्ट्रवादीत नेतृत्व करण्यास अपयशी ठरलेल्या टिकेवर भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“राज्यातील राजकारणात पुन्हा बदलाचे वारे, ११ ते १३ मे या काळात काही तरी मोठं घडेल”
तसेच ते कोण कोणाच्या घरात गेलं होतं. ते माहिती नाही. पंरतु इतकं लक्ष त्यांनी शिंदे गटातील नेत्यांच्या बॅंगावर ठेवलं असतं. तर हे चित्र दिसलं नसतं. असंही त्यांनी म्हटलं आहे. आज सामानातून संजय राऊतांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरेंना सांगूनही स्नेहल जगतापांना प्रवेश दिला”, नाना पटोलेंची टिका, आघाडीत बिघाडीची शक्यता ?
हेही वाचा…कोण पार्सल ते फडणवीसांना निपाणीत सांगणार ? फडणवीसांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहण्यांपैकी, त्यांना सत्तेची लालसा”
हेही वाचा…“शरद पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष पुढे नेईल, असा ‘वारसदार’ निर्माण करण्यात अपयशी”
हेही वाचा…मोठी बातमी..! “संजय राऊत १० जुनपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार”