मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतांना शरद पवारांनी अचानकपणे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तो राजीनामा मागे घेत अनेकांची अडचण केली. मात्र यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर फडकवण्यासाठी आबा मी आज उद्धवसाहेबांसोबत”, स्नेहल जगतापांचा ठाकरे गटात प्रवेश
शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे वादळ निर्माण झालं होतं. बरेच लोक देव पाण्यात ठेऊन बसले होते. जे होत आहे, ते व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आहे. शरद पवार नसते. तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते. मात्र, ही शक्यता आता मावळली असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अजित पवार भाजपसोबत येणार नाहीत, राष्ट्रवादीची नौटंकी चाललीय”
जयंत पाटलांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना आनंद साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यातील राजकारणात पुन्हा बदलाचे वारे, ११ ते १३ मे या काळात काही तरी मोठं घडेल”
हेही वाचा…कोकणात आज दोन “ठाकरी” सभा होणार ? कोण निशाण्यावर? कुणावर टिकास्त्र? सगळ्याचं लक्ष
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र ठरले तरी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, कारण..” शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली, त्यांना ३ जिल्हातील लोकही ओळखत नाही”
हेही वाचा…“साथ द्यायचं सोडून चंद्रकांत पाटील अन् शंभुराज देसाई कोणत्या बिळात लपून बसले ?”