मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडल्याची घोषणा केल्यानंतर खळबळ माजणे साहजिकच होती. शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष अन् राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी आतापर्यंत पक्ष टिकवला, चालवला. परंतु यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व शरद पवार पक्षात उभे राहू शकले नाहीत. असं विधान सामानातून करण्यात आलं आहे.
हेही वाचा…“ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली, त्यांना ३ जिल्हातील लोकही ओळखत नाही”
मागील तीन ते चार दिवसापुर्वी राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोष्टींमुळे शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात एकच चर्चा रंगली होती. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्राहानानंतर शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली. शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते असून त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे. परंतु पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व चारेक दिवसांपुर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बांध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार या चिंतेंने हादरून गेला. असंही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा…“साथ द्यायचं सोडून चंद्रकांत पाटील अन् शंभुराज देसाई कोणत्या बिळात लपून बसले ?”
सामानातून भाजपवर जोरदार टिकाही करण्यात आली आहे. भाजप हा एक पोटदुख्या पक्ष आहे. दुसऱ्यांचे चांगले व्हावे किंवा बरे घडावे असे त्यांना कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष किंवा घरे मोडून हा पक्ष उभा राहिला आहे. दुसरे असे की, इतरांवर नौटंकी असा आरोप करण्यापुर्वी जगातील सगळ्यात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातिकीर्त पावलेल्या आपल्या पंतप्रधान मोदींकडे त्यांनी आधी पाहायला हवे. असा हल्लाबोल ही करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! “संजय राऊत १० जुनपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार”
हेही वाचा…“शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…“राज्यातील राजकारणात पुन्हा बदलाचे वारे, ११ ते १३ मे या काळात काही तरी मोठं घडेल”
हेही वाचा…कोकणात आज दोन “ठाकरी” सभा होणार ? कोण निशाण्यावर? कुणावर टिकास्त्र? सगळ्याचं लक्ष
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र ठरले तरी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, कारण..” शरद पवारांचं मोठं विधान