नाशिक : शरद पवार हे राष्टीय पातळीवरील मोठे नेते असून त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे. परंतु पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. तसेच चारेक दिवसांपुर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बांध्यापासून हादला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार या चितेंने हादरून गेला. अशी टिका संजय राऊत यांनी सामानातून केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.
हेही वाचा…“उधारीवर ताज महल घ्यायला मला पण आवडेल”, म्हणून आव्हाडांनी सरकारवर केली टिका
संजय राऊतांना आता सगळं उकरून काढायची काय गरज होती? यामुळे राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अन् त्यात मनभेद निर्माण व्हावं असं त्यांना वाटत आहे का ? असा सवाल छगन भुजबळ यांनी राऊतांना केला आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील असे अनेक नेते काम करण्यास समर्थ आहेत. असंही त्यांनी राष्ट्रवादीत नेतृत्व करण्यास अपयशी ठरलेल्या टिकेवर भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“शरद पवार घटना बदलून अध्यक्ष झालेत, मग ते दुसऱ्याला अध्यक्ष कसे होऊ देतील ?” भाजपची टिका
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, संजय राऊतांचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवारांचं राजकारण आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेत आहेत. काय माहिती ते कोणाकोणाच्या घरात गेले होते? कोणाकोणाच्या बॅगा त्यांनी तपासल्या? हे त्यांनी तपासल्या? हे त्यांनाच माहिती. इतकं लक्ष त्यांनी शिंदे गटावर ठेवलं असतं त्यांच्या बॅगांवर ठेवलं असतं तर आज आपल्याला बाहेर बसावं लागलं नसतं. आजची परिस्थिती आली नसती. असंही भुजबळांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“१६ आमदाराचं प्रकरण माझ्याकडे आल्यास आमदार अपात्र”, नरहरी झिरवाळ
हेही वाचा…“तो गब्बर श्रीमंत झाला, अन् माझा कोकणी माणूस तसा राहिला”, राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?
हेही वाचा…“सामनात काय लिहायचं, काय नाही, हे..” राष्ट्रवादीवर केलेल्या राऊतांच्या टिकेला शिवसेनेकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…“कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी उमेदवारांना विजयी करा”, राज ठाकरेंचं मराठी भाषिक मतदारांना आवाहन
हेही वाचा…“वरती यशवंत चव्हाण साहेब देखील राज्याची राजकीय परिस्थिती पाहून रडत असतील”, अजित पवार