मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कुठलेतरी मुद्दे काढायचे, त्यांचा विपर्यास करायचं आणि महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करायचं हेच सुरू आहे. कोणालाही कोकणी माणसाविषयी आस्था नाही. याठिकाणी प्रकल्प आणायचे आणि जमिनींच्या व्यवहारात बाहेरच्यांनी पैसे कमवायचे हे वर्षानुवर्ष सुरू आहे. दाभोळला एनरॉनच्या वेळेस, जैतापूर असो, नाणार आणि बारसू असो इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या आणि अव्वाच्यासव्वा भावाला सरकारला विकल्या, तो गब्बर श्रीमंत झाला, अन् माझा कोकणी माणूस तसा राहिला. असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत केला.
हेही वाचा…“तेव्हा शाळेतील मुलंही म्हणू लागले की ‘आ गए गद्दार’, ” शरद पवारांनी तो किस्सा सांगत शिंदेंवर साधला निशाणा
राज ठाकरे यांची कोकणात जाहीर सभा पार पडली. त्या सभेत त्यांनी राज्यातील विविध मुद्यांसोबत कोकणातील प्रकल्पाबाबतही भाष्य केलं. कोकण ही प्रतिभावंतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या भारतरत्नंपैकी ६ भारतरत्न ही कोकणातून आहे. इतक्या प्रतिभावन कोकणी माणसाला काय झालं आहे.? कोकणावर निसर्गाची मुक्त हस्ताने इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवले. पण कोणाला काहीच घेणंदेणं नाही. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राऊतांना दुसऱ्याच्या घरात घुसायची गरज काय ?” भुजबळांनी संजय राऊतांना झापलं
राज ठाकरे यांनी कोकणातील प्रकल्पावरून शिवसेनेवरही टिका केली आहे. आधी नाणारला प्रकल्प होणार असं सांगितलं, मग तो बारगळला. आता बारसू. बारसूमध्ये युनेस्कोलो कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूचं जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत. त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प करता येणार नाही, इतकचं काय युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही. असंही राज ठाकरे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“सामनात काय लिहायचं, काय नाही, हे..” राष्ट्रवादीवर केलेल्या राऊतांच्या टिकेला शिवसेनेकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…“कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी उमेदवारांना विजयी करा”, राज ठाकरेंचं मराठी भाषिक मतदारांना आवाहन
हेही वाचा…“वरती यशवंत चव्हाण साहेब देखील राज्याची राजकीय परिस्थिती पाहून रडत असतील”, अजित पवार
हेही वाचा…“उधारीवर ताज महल घ्यायला मला पण आवडेल”, म्हणून आव्हाडांनी सरकारवर केली टिका
हेही वाचा…“शरद पवार घटना बदलून अध्यक्ष झालेत, मग ते दुसऱ्याला अध्यक्ष कसे होऊ देतील ?” भाजपची टिका