पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर राज्यातील राजकीय नेते महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात आपापल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीत साडेतीन जिल्हाचा पक्ष म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जहरी टिका केली. त्यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांनावर टिका केली आहे.
हेही वाचा…“वरती यशवंत चव्हाण साहेब देखील राज्याची राजकीय परिस्थिती पाहून रडत असतील”, अजित पवार
देशात हुकूमशाही वाढत आहे. सामान्य माणसाला बोलू दिले जात नाही. त्यामुळे देशातील सामान्य माणुस एकवटत आहे. कर्नाटक राज्यातही हा बदल दिसून येतोय. कर्नाटक राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे चार ते पाच आमदार निश्चित निवडून येतील. असं जंयत पाटील यांनी म्हटलं आहे. निपाणी येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तर पाटील यांच्या प्रचारार्थ जंयत पाटील बोलत होते.
हेही वाचा…“उधारीवर ताज महल घ्यायला मला पण आवडेल”, म्हणून आव्हाडांनी सरकारवर केली टिका
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कर्नाटकात येऊन राष्ट्रवादी पक्ष हा साडेतीन जिल्हाचा पक्ष आहे असे सांगता. मात्र ज्यांचा भारतीय जनता पक्षाने फौजदाराचा हवालदार केला आहे. त्या लोकांनी आमची मापं काढावी का असा टोला जयंत पाटलांनी भाजप आणि फडणवीसांना लगावला. पुढे बोलतांना ते म्हणाले की, निपाणीचा पहिला प्रश्न् हा पाण्याचा आहे. हा प्रश्न सोडवण्याचे काम निश्चित केले जाईल. पवार साहेबांच्या झंझावातात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पक्षाचा नवा चेहरा आणि नवे नेतृत्व पुढे आणण्याचे काम करावे.असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊतांना राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं वाटतं का ?”
हेही वाचा…“१६ आमदाराचं प्रकरण माझ्याकडे आल्यास आमदार अपात्र”, नरहरी झिरवाळ
हेही वाचा…“तो गब्बर श्रीमंत झाला, अन् माझा कोकणी माणूस तसा राहिला”, राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?
हेही वाचा…“सामनात काय लिहायचं, काय नाही, हे..” राष्ट्रवादीवर केलेल्या राऊतांच्या टिकेला शिवसेनेकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…“कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी उमेदवारांना विजयी करा”, राज ठाकरेंचं मराठी भाषिक मतदारांना आवाहन