निपाणी : कर्नाटकमध्येही भाजपचे राज्य आहे. खरंतर अनेक ठिकाणी भाजप सत्तेत निवडून आलेला नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार फोडून त्यांनी सत्तांतर केले. मध्यप्रदेश आणि अशी अनेक राज्य सांगता येतील जिथे धनाचा वापर करून माणसे फोडणे आणि त्यातून सरकार बनवणे ही भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे.त्याला कर्नाटकही अपवाद नाही. म्हणून या देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. ते निपाणी बोलत होते.
हेही वाचा…“सामनात काय लिहायचं, काय नाही, हे..” राष्ट्रवादीवर केलेल्या राऊतांच्या टिकेला शिवसेनेकडून स्पष्टीकरण
कर्नाटक निवडणुकीत निपाणी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांच्या प्रचारसभेला उपस्थित शरद पवारांनी जनतेशी संवाद साधला. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतला की या राज्यातील सामान्य माणसाचे दुखणे, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विकासासंबंधीची भूमिका गतिमान करण्यासाठी आपले उमदेवार उभे केले पाहिजेत. यातून संपूर्ण कर्नाटकला कळेल की कर्तृत्व आणि विकास याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.
हेही वाचा…“कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी उमेदवारांना विजयी करा”, राज ठाकरेंचं मराठी भाषिक मतदारांना आवाहन
आज देशात वेगळे चित्र आहे. निवडणुक कर्नाटकमधील आहे. परंतु संपुर्ण देशाचे चित्र पाहिले तर नवनवीन समस्या दिसत आहेत. देशाच्या सीमेवरील राज्यात शांतता असणे गरजेचे आहे. मणिपुर येथे मागील सहा दिवस संघर्ष सुरू आहे. ज्यात ५४ विद्यार्थी आणि तरूण मृत्यूमुखी पडले. याठिकाणी सत्ता भाजपची आहे. ज्यांच्या हाती देश आहे. त्यांना मणिपुरसारखे राज्य सांभाळता येत नाही. तर मतं मागण्यासाठी प्रधानमंत्री कर्नाटकात हिंडत आहेत. ते फिरत असताना काॅंग्रेस आणि विरोधकांना शिव्या देतात. खरंतर पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या हाती असलेल्या सत्तेचा वापर करून मणिपुर कसे वाचवता येईल. यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पण त्याचे लक्ष त्याठिकाणी दिसत नाही. असंही शर पवार सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…“आमचं बोलणं थेट ठाकरेंशी असतं, त्यामुळे राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही” नाना पटोले
हेही वाचा…भाजपने फौजदाराचा हवालदार केलाय, त्यांनी आमची मापं काढावी का? जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल
हेही वाचा…“संजय राऊतांना राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं वाटतं का ?”
हेही वाचा…“१६ आमदाराचं प्रकरण माझ्याकडे आल्यास आमदार अपात्र”, नरहरी झिरवाळ
हेही वाचा…“तो गब्बर श्रीमंत झाला, अन् माझा कोकणी माणूस तसा राहिला”, राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?