मुंबई : आगामी काळात राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकां होऊ घातल्या आहेत. राज्यात सत्तासंघर्षानंतर राज्यातील राजकीय गणित बदलली आहेत. भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी युती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अशी निवडणुकीची थेट लढत होण्याची शक्यता आहे. यातच आता मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यातच भाजपने यासाठी मोठी रणनीती आखली आहे.
हेही वाचा…“तो गब्बर श्रीमंत झाला, अन् माझा कोकणी माणूस तसा राहिला”, राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?
मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे जवळपास २५ वर्षापासून ताब्यात आहे. यातच मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपने शिवसेना फोडल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे भाजप गटात गेल्याने भाजपला आता मुंबई पालिका जिंकणे सोपे ठरले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे जनमत असल्याने भाजपने याची धास्ती घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्यासाठी भाजपची मिशन १५० साठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
हेही वाचा…“सामनात काय लिहायचं, काय नाही, हे..” राष्ट्रवादीवर केलेल्या राऊतांच्या टिकेला शिवसेनेकडून स्पष्टीकरण
मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन भाजप महिन्याभरात आढावा बैठका घेत आहे. या महिन्यात अनेक पदांची खांदेपालट केली जाणार आहे. यामध्ये पन्ना प्रमुख, बुथप्रमुख स्तरावर अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना डच्चू दिला जाणार असून गरज भासल्यास वॉर्ड आणि जिल्हाध्यक्षही बदलणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. यातच राज्याच्या प्रदेश कार्यकारिणीप्रमाणे मुंबई कार्यकारिणीत महिनभरात मोठे बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आलीय” शरद पवार
हेही वाचा…“आमचं बोलणं थेट ठाकरेंशी असतं, त्यामुळे राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही” नाना पटोले
हेही वाचा…भाजपने फौजदाराचा हवालदार केलाय, त्यांनी आमची मापं काढावी का? जयंत पाटलांचा फडणवीसांना खोचक सवाल
हेही वाचा…“संजय राऊतांना राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं वाटतं का ?”
हेही वाचा…“१६ आमदाराचं प्रकरण माझ्याकडे आल्यास आमदार अपात्र”, नरहरी झिरवाळ