मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसचा विषय शरद पवार आणि अन् त्यानंतर संजय राऊत यांच्यामुळे चर्चेत आला. त्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच पार्श्भूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांनी दोन वेळा नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फसवलं”
मुंबईत मागच्या काही दिवसापुर्वी भावी मुख्यमंत्र्याचे बॅनर्स लावण्यात आले. त्यावर होर्डिंग लावून जर भावी मुख्यमंत्री झाले असते तर प्रत्येक लोकांची इच्छा आकांक्षा पुर्ण झाल्या असत्या. असा टोला श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीला लगावला. तसेच अजित पवार यांची हवा निघाली आहे. त्यांची ओळख ही काकांमुळे आहे. असंही शिंदे म्हणाले. तसेच सकाळचा भोंगा रोज बघतो पण त्या भोंग्यावर मला जायचं नाही. अशी प्रतिक्रिया शिंदेंनी संजय राऊतांवर दिली.
हेही वाचा…महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष..! 11, 12 मे ला निकाल लागणार? काय निकाल लागणार? असीम सरोदेंनी केली ‘ही’ शक्यता
दहा महिन्यात या सरकारने चांगलं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सरकार काम करीत आहे. मागच्या सरकारने कोवीड नावावर लोकांना घरात बसवण्याचे काम केले आहे. वर्षा बंगला वर जाण्यासाटी मागील सरकारमध्ये ठाकरेंची परवानगी घ्यावी लागत होती. मात्र हा बंगला आता सर्वांसाठी खुला असल्याचंही शिंदेंनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…पुणे शहाराध्यक्ष बदलणार? भाजपची पुण्यातील कार्यकारिणीत बदल, कुणाला संधी ?
हेही वाचा…पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने रान पेटलं, शरद पवारांचं प्रत्युत्तर तर नाना पटोले
हेही वाचा…“१६ आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे”, विधानसभा अध्यक्ष
हेही वाचा…राष्ट्रवादीचा पुढचा वारसदार कोण? शरद पवारांनी थेट नावचं सांगितली, वाचा यादी
हेही वाचा…..तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल न्यायालय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार ?