सातारा : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या राष्ट्रवादीच्या टिकेनंतर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांकडून राऊतांचं समर्थन कऱण्यात आलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते सातारा येथे बोलत होते.
हेही वाचा…“देशात पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आलीय” शरद पवार
घरामध्ये आमच्यातील प्रत्येक सहकाऱ्याला माहीत आहे की, आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. नेतृत्वाची फळी पक्षामध्ये कशी तयार केली जाणार याची खात्री पक्षातील सर्व सहकारऱ्यांना आहे. १९९९ साली आम्ही सत्तेत आलो तेव्हा आम्हाला मंत्रिमंडळ तयार करायचे होते. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेसचे संयुक्त मंत्रिमंडळ होते. त्या मंत्रिमंडळात जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, आर. आर. पाटील अशी अनेक नावं होती. ज्यांची ती पहिली टर्म होती. त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
हेही वाचा…“आमचं बोलणं थेट ठाकरेंशी असतं, त्यामुळे राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही” नाना पटोले
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जेव्हा मंत्रिमंडळात गेलो तेव्हा मला पहिले राज्यमंत्री पद मिळाले. काही वर्ष राज्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर कॅबिनेट मंत्री पद मिळाले. त्यानंतर मी घेतलेल्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्यांनी प्रत्येकाने आपले कर्तृत्व सिद्ध केले. याबद्दल कोणी काय लिहिले याचे महत्व आमच्या दृष्टीने नाही. त्यांचा लिहिण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. असंही शरद पवारांनी राऊतांच्या टिकेवर उत्तर दिलं.
READ ALSO :
हेही वाचा…..तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल न्यायालय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार ?
हेही वाचा…“अजित पवारांनी दोन वेळा नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फसवलं”
हेही वाचा…महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष..! 11, 12 मे ला निकाल लागणार? काय निकाल लागणार? असीम सरोदेंनी केली ‘ही’ शक्यता
हेही वाचा…““कर्नाटक अन् केंद्रातील सत्ता गेल्यानंतर नरेंद्र मोदी देखील तुरूंगात जातील”
हेही वाचा…“मिशन मुंबई पालिकासाठी भाजपचं ‘मिशन १५०’ साठी जोरदार फिल्डिंग”, भाजप कार्यकारिणीत मोठे बदल ?