पुणे : परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खळबळजनक पत्रानंतर सुरु झालेला ‘लेटरबॉम्ब’ चा सिलसिला अजूनही कायम असून, आमदार प्रताप सरनाईकांनंतर आता, अजून एका शिवसेनेच्या माजी मंत्र्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली खदखद व्यक्त केली आहे.
नाहीतर तिसरी लाट येण्याआधी दुसरी लाट उलटेल, मुख्यमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा
शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी, पुणे जिल्ह्यातील पुरंदर हवेली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्याबद्दलचे, श्रेयवादाचा आरोप करणारे पत्र लिहिले असून, त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यात त्यांनी जगतापांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या उद्घाटनावरुन, हा सगळं वाद सुरु झाला असून, शिवतारे यांनी पत्रात, “राज्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मी मोठ्या मेहनतीतून पुरंदर, भोर आणि वेल्हा या ३ तालुक्यासाठी वरदान ठरेल असे, गुंजवणी धरणाचे काम पूर्ण केले. तसेच, पुरंदरमध्ये जलवाहिनीच्याही कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, यात सातत्याने अडथळे आणण्याचे काम जगतापांकडून केले जात असून, तोंडल इथले काम अधिकाऱ्यांना धमकावत बंद करण्याच्या सूचना, त्यांनी दिल्या आहेत. तसेच, या कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते व्हावे, असा त्यांचा आग्रह आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
अजित पवार मुर्दाबाद..; सुप्रिया सुळेंसमोरच आंबील ओढ्यातील नागरिकांच्या जोरदार घोषणा
तसेच, “जलवाहिनी बंदद्वारे १००% सूक्ष्म सिंचन करणारा, हा देशातील पहिला प्रकल्प असून, तो देशाला दिशा देणारा आहे. त्यासाठी, मी तब्बल १३१३ कोटी रुपयांची मंजुरी मिळवली. हरित लवाद, जलसंपत्ती अधिनियम प्राधिकरण, उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण विभाग अशा अनेक ठिकाणी सातत्याने याचिका करून काम होऊ नये, म्हणून मला अडथळे आणण्यात आले. त्यामुळे, आता या कामाचा शुभारंभ माझ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावा, अशी माझी इच्छा आहे,” अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांला केली आहे.
Read Also :
- “सरकारबद्दची अस्वस्थता दडपण्यासाठी लावण्यात आलेली ही सामाजिक दडपशाही”
- “शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता, राऊतांनी फडणवीसांची काळजी करण्यापेक्षा शिवसेनेची करावी”
- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकांना ६ महिने मुदतवाढ द्या! राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका
- “इशाऱ्यावर चालणारा ‘वाघ’ फक्त सर्कसमध्ये असतो, नाहीतर त्या वाघाला पाळलेला ‘कुत्रा’ म्हणतात”
- वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी असल्याने महसूल खातं मिळत नाही”, थोरात म्हणतात…