नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने, ओबीसी समाजाचं, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर, ओबीसी आरक्षणाला घेऊन सध्या राज्यात प्रचंड गदारोळ सुरु आहे. त्यासाठी भाजपने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनही केलं. यातच, आता निवडणूक आयोगाने राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही नेते आणि भाजप नेत्यांनी निवडणूका रद्द करण्याची मागणी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी असल्याने महसूल खातं मिळत नाही”, थोरात म्हणतात…
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात, यासंदर्भातील एक याचिका दाखल करण्यात आली असून, त्यात ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम ६ महिने पुढे ढकलण्याची किंवा इम्पेरिकल डाटा मिळेपर्यंत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. आघाडी सरकारकडून आज ही याचिका न्यायालयात दाखल केली गेली आहे. या मागणीसोबतच सरकारकडून अजून एक याचिका उद्या दाखल केली जाणार असून, त्यात केंद्राकडून इम्पेरिकल डाटा मिळवण्याची मागणी करण्यात येणार आहे.
ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात; विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
केंद्राकडे २०११ चा इम्पिरिकल डेटा आहे. तो त्यांनी राज्य सरकारला द्यावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावे. त्यामुळे, ओबीसी आरक्षणासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाणे सोपे होईल. तसेच, ओबीसी आरक्षणासाठी आयोग नेमला गेला असून, त्यांच्या मदतीने ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरु आहे. या परिस्थितीत घराघरात जाऊन डेटा गोळा करणे, कितपत शक्य आहे, एकचि शक्यता पडताळून घेतली जाणे गरजेचे आहे, हे सर्व काम, आयोगावरच सोपवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे मत ऐकून, मग आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ, पंतप्रधान मोदींची भेट घेऊ,” असं ओबीसी नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
Read Also :
- “इशाऱ्यावर चालणारा ‘वाघ’ फक्त सर्कसमध्ये असतो, नाहीतर त्या वाघाला पाळलेला ‘कुत्रा’ म्हणतात”
- “वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?”
- …तर नगरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर येणार राष्ट्रवादीचा महापौर? सुजय विखेंच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
- अजित पवार मुर्दाबाद..; सुप्रिया सुळेंसमोरच आंबील ओढ्यातील नागरिकांच्या जोरदार घोषणा
- मंत्र्यांनो हा ट्रॅक योग्य नव्हे…; क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त