मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून रस्त्यावर उतरुन जेल भरो आणि चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान होणार, अशी आंदोलनामागची भूमिका भाजपने सांगितली.
मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत
दरम्यान, नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. यावेळी, फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरादार हल्ला चढवला. विशेष करून त्यांनी काँग्रेसला आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. “ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे,” असं म्हणत त्यांनी, “माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिलीत, तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन,” अशी सिंहगर्जना फडणवीसांनी केली.
‘सर्वकाही मनाप्रमाणे होईल, पण संन्यास घेऊ नका’, फडणवीसांवर सामनातुन खोचक टीका
यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी, “फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील, तर मी स्वत: त्यांची भेट घेईन”, असा टोला लगावला, आता यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले असून, संजय राऊतांचे त्यांनी जाहीर पत्र लिहून, फडणवीसांच्या नेतृत्त्वावर, राऊतांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणजे काँग्रेस पक्षातील असंतोषाचे मुर्तीमंत उदाहरण; प्रविण दरेकरांची खोचक टीका
“मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न असे सगळे कठीण प्रश्न सोडविण्याची चावी फक्त फडणवीस यांच्याकडेच आहे. फडणवीस हे चतुर व चाणाक्ष नेते आहेत,” असा उल्लेख सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. यावर, उशीरा का होईना, पण फडणवीसांच्या नेतृत्वगुणांबाबत आपल्याला उपरती झाली, हेही नसे थोडके,” अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
सर्व चाव्या फडणवीसांकडे
तर मग पाठीत खंजीर का खुपसला ???? pic.twitter.com/1QjoWq7Di4— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 28, 2021
काय लिहिले आहे पत्रात…
“सर्व कठीण प्रश्न सोडवण्याची चावी फडणवीसांच्याकडे आहे, याचे भान सेनेला २०१९ मध्ये झाले असते, तर फडणवीसच पुन्हा युतीचे मुख्यमंत्री झाले असते आणि आज महाराष्ट्राच्या इज्जतीची, जशी लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, ती टांगली गेली नसती. मात्र, असे करण्याऐवजी आपण पाठीत खंजीर खुपसलात आणि राज्यातील जाणत याची साक्षी आहे. एका कर्तृत्ववान नेत्याला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यात, आपल्याला आनंद आपल्याला मिळाला असेलच, पण अशावेळी, सत्तेपासून काँग्रेस-राष्ट्रवादीला कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि आग्रह करणाऱ्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना काय वाटेल? याचा क्षणभर तरी विचार केला असता, तर हा प्रयोग आपण केला नसता,” असं त्यांनी म्हटलं आहे.
“लेकीनेही बापाच्या कामाचा विचार करून, त्याच्या कामाची जाण ठेवली पाहिजे”
“एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांचे पंख भाजपने कापल्याचा जावईशोध आपण लावला आहे. खडसेंना जर खरंच, पंख कापल्यासारखे वाटत होते आणि त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला व राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले. तर, तिथे त्यांची पद न देताच बोळवण केलेली दिसत आहे. त्यामुळे, त्यांच्या सन्मानाची आपल्याला एवढीच चिंता असेल, तर ‘सिल्व्हर ओक’वर आपले वजन वापरून खडसेंचे चांगले पुनर्वसन करावे, अशी विनंती आहे. शिवसेनेतही निष्ठावंतांचे हाल झाल्याची उदाहरणे अवतीभवती आहेतच,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी असल्याने महसूल खातं मिळत नाही”, थोरात म्हणतात…
“ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज उभी करुन, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला टिकवायचं होतं, तेव्हा यांचे मंत्री रस्त्यावर उतरुन मोर्चे काढत होते. त्यामुळे हे आरक्षण, केवळ आणि केवळ आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे आणि ही बाब आता लपून राहिलेली नाही. सरकारने जो सर्वोच्च न्यायालयात, ‘तारीख पे तारीख’ चा घोळ घातला, त्याचे परिणाम आज ओबीसी समाज भोगत आहे,” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लबोल केला.
“आमच्या हाती सत्तेची सूत्रे द्या, ३ महिन्यात हे आरक्षण पूर्ववत करून देतो, हा फडणवीसांनी व्यक्त केलेला ठाम विश्वास, ओबीसींच्या प्रश्नांबाबत त्यांना असलेल्या सखोल ज्ञानातून आणि त्यांच्याप्रती, त्यांच्या मनात असलेल्या कळवळ्यातून आलेला आहे. ओबीसी बांधवांमध्ये राहूनच, त्यांनी आपल्या राजकारणाचा श्री गणेशा केला आणि ओबीसी समाजाने साथ दिल्यानेच इथवर आलो, अशी कृतज्ञता फडणवीस यांनी जाहीरपणे अनेकदा व्यक्त केली आहे,’ याची आठवण वाघ यांनी करून दिली आहे.
Read Also :
- “इशाऱ्यावर चालणारा ‘वाघ’ फक्त सर्कसमध्ये असतो, नाहीतर त्या वाघाला पाळलेला ‘कुत्रा’ म्हणतात”
- “वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?”
- अजित पवार मुर्दाबाद..; सुप्रिया सुळेंसमोरच आंबील ओढ्यातील नागरिकांच्या जोरदार घोषणा
- मंत्र्यांनो हा ट्रॅक योग्य नव्हे…; क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
- ‘साहेब शिवसेना वाचवा, माझ्या मोठ्या साहेबांचा शिवसैनिक वाचवा’ कट्टर शिवसैनिकाने फोडला टाहो