मुंबई : महामारीची पहिली लाट देशात आली, तेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनच्या छायेत होता. ती ओसरल्यानंतर सर्व काही नेहमीप्रमाणे सुरळीत झालं. मात्र, महामारीच्या दुसऱ्या लाटेबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनदेखील तयार नव्हतं. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता, राऊतांनी फडणवीसांची काळजी करण्यापेक्षा शिवसेनेची करावी”
तसेच, आता ही लाट ओसरत आहे. त्यामुळे, निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, त्यामुळे वाढलेल्या गर्दीची मात्र आता चिंता वाटत आहे. महामारीची तिसरी लाट कधी येईल, हे सांगता येत नाही. मात्र, सध्याची गर्दी पहिली, तर हीच लाट पुन्हा उलटेल का?, हा मोठा धोका वाटत आहे,” अशी भीती त्यांनी, मालाड मधल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनावेळी व्यक्त केली.
महामारीच्या दुसऱ्या लाटेतच ‘डेल्टा प्लस’ हा विषाणू पसरत आहे. त्याने अजून आपले रंग दाखवले नाहीयेत पान ती राज्यात आहे. त्यामुळे, नागरिकांनी आत्ता गर्दी टाळली नाही, तर हीच लाट उलटण्याची चिन्हे जास्त आहेत,” असं म्हणत वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली आणि सावधानतेचा इशारा दिला.
Read Also :
- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकांना ६ महिने मुदतवाढ द्या! राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका
- “इशाऱ्यावर चालणारा ‘वाघ’ फक्त सर्कसमध्ये असतो, नाहीतर त्या वाघाला पाळलेला ‘कुत्रा’ म्हणतात”
- वडेट्टीवार म्हणाले, “ओबीसी असल्याने महसूल खातं मिळत नाही”, थोरात म्हणतात…
- “वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यँत लग्न करणार नाही, फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं?”
- …तर नगरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर येणार राष्ट्रवादीचा महापौर? सुजय विखेंच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण