पुणे :पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, आज रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर प्रसारमध्यांशी बोलताना त्यांनी, “पुणे महापालिकेच्या कचरा प्रकल्पाच्या निधीची सीबीआय आणि इडीमार्फत चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी केली आहे.
“अजित पवारांचा विरोधात पुरावे द्या खरं असेल तर मी स्वतः तक्रार करेन”
“पुणे महापालिकेच्या माध्यमातून कचरा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले आहेत. शहरातील कचरा, उरुळी देवाची आणि रामटेकडी इथल्या कचरा डेपोत, कित्येक वर्षांपासून येत आहे. इथे येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असते. मात्र, सध्या इथल्या कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात येत असल्याचे दिसत नाहीये. त्यामुळे, आजवर कचरा प्रकल्पाच्या प्रक्रियेसाठी दिलेला, जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी दिला गेला कुठं, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी त्यांनी मागणी केली.
अजित पवार मुर्दाबाद..; सुप्रिया सुळेंसमोरच आंबील ओढ्यातील नागरिकांच्या जोरदार घोषणा
यावर, आता महापौर मुरलीधर मोहोळ यांणी उत्तर दिले असून, ट्विट करत त्यांनी, “सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत ! पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करण्याची मागणी केली आहे,” अशी टीका केली आहे.
पुणे महापालिकेने दिलेले २०० कोटी गेले कुठे?, ED, CBI चौकशी करा – सुप्रिया सुळे
तसेच, “सुप्रियाताईंनी ED मार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचं स्वागत करतो. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ED चौकशी बाबतीतही सुप्रियाताईंनी हाच विश्वास कायम ठेवावा,” असा खोचक टोला त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.
सुप्रियाताईंनी ED मार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचं स्वागत करतो. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ED चौकशी बाबतीतही सुप्रियाताईंनी हाच विश्वास कायम ठेवावा.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 28, 2021
“सुप्रियाताई यांची खासदारकीची यंदा तिसरी टर्म आहे. २०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर त्यांचे बंधू मा. अजितदादा यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का ?,” असा रोखठोक सवाल उपस्थित करत त्यांनी, “गेल्या ४ वर्षात, कचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या प्रयत्नांची दखल, राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. कालच पुण्याच्या Waste Managment ची दखल केंद्राने घेतली,” असं सांगितलं आहे.
उलट गेल्या ४ वर्षात आम्ही कचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय पातळीवर सातत्याने घेतली जात आहे. अगदी कालच पुण्याच्या Waste Managment ची दखल केंद्राने घेतली. कचरा प्रक्रिया करण्यासाठी ६ नवे प्रकल्प हे आमच्याच काळात म्हणजे गेल्या चार-साडेचार वर्षांत सुरू झाले.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 28, 2021
“भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महानगरपालिका आल्यानंतर पुणे शहराच्या कचरा प्रक्रियेची क्षमता १२०० मेट्रिक टनावरून १८०० मेट्रिक टनापर्यंत वाढवली गेली. याचीही माहिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात ‘एक्टिव्ह’ होत असलेल्या सुप्रियाताईंनी घ्यावी. आपल्या पक्षाने तर अनेक सुरू होणारे प्रकल्प तोडफोड करून जाळपोळ करून बंद पाडले. मात्र केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कचऱ्यावर झालेल्या खर्चाची मागणी करणे म्हणजे ताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे,” अशा शब्दांत त्यांनी सुप्रिया सुळेंच्या टिकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
आपल्या पक्षाने तर अनेक सुरू होणारे प्रकल्प तोडफोड करून जाळपोळ करून बंद पाडले. मात्र केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कचऱ्यावर झालेल्या खर्चाची मागणी करणे म्हणजे ताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 28, 2021
Read Also :
- “फडणवीसांवर विश्वास कसा ठेवणार? ‘तो अध्यादेश म्हणजे ओबीसींची फसवणूक”, खडसेंकडून हल्लाबोल
- मुख्यमंत्र्यांना मिळाला अजून एका मंत्र्याकडून लेटरबॉम्ब, केला काँग्रेस आमदारावर गंभीर आरोप
- “सरकारबद्दची अस्वस्थता दडपण्यासाठी लावण्यात आलेली ही सामाजिक दडपशाही”
- नाहीतर तिसरी लाट येण्याआधी दुसरी लाट उलटेल, मुख्यमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा
- कठीण प्रश्न सोडवण्याची चावी फडणवीसांकडेच, ‘सामना’तून गायले गेले फडणवीसांच्या नेतृत्वाचे गोडवे; भाजपने मानले जाहीर आभार