औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी आज पुण्यातून रवाना झाले. मात्र रस्त्यात त्यांच्या गाड्याच्या ताफ्याला दोनदा अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकामागून एक अपघात झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये थोडा चिंतेचा विषय झाला असून मात्र राज ठाकरे हे औरंगाबाद येथे सुखरूप पोहचले आहेत. पहिला अपघात घोडेगाव येथे घडला. त्यानंतर लगेचच दुसरा अपघात हा औरंगाबादजवळील वाळूज याठिकाणी घडला.
“दंगली पसरू देऊ नका, शांतता व सलोखा राखा”; राज ठाकरेंच्या सभेपुर्वी वंचितचा कार्यकर्त्यांना आवाहन
वाळूज येथे घडलेल्या अपघातात पुणे मनसे शहाराध्यक्ष साईऩाथ बाबर यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. त्यावेळी ते थोडक्यात बचावले. तसे या अपघातात एकुण 12 गाड्याचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. तर त्याआधी पहिला अपघात अहमदनगर येथील घोडेगाव येथे घडला होता. त्यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांचं त्यात अपघातात बचावले. त्यावेळी त्यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे.
“मुख्यमंत्र्यांची अवस्था सध्या गजनीसारखी”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनसेकडून प्रत्युत्तर
औरंगाबादपासून अवघ्या 20 किलोमीटरच्या अंतरावर पुढील गाडीने अचानक ब्रेक मारला. त्यानंतर मागील गाड्या या वेगाने असल्याने पुढच्या गाड्यावर येऊन धडकल्या. यात गाड्याचं नुकसान झालं आहे. अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांची मर्सिडीज गाडीचं नुकसान झालं आहे.
विरोधकांचा समाचार, तर हिंदुत्वाचा ज्वलंत मुद्दा, राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार?
औरंगाबादपासून अवघ्या 20 किलोमीटरच्या अंतरावर पुढील गाडीने अचानक ब्रेक मारला. त्यानंतर मागील गाड्या या वेगाने असल्याने पुढच्या गाड्यावर येऊन धडकल्या. यात गाड्याचं नुकसान झालं आहे. अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांची मर्सिडीज गाडीचं नुकसान झालं आहे.
Read also:
- राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात! 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या
- “हिरवा शालू नेसलेली राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस सुर्यादय होण्याअगोदर लगेच त्यांच्या अंगावर भगवा शालू आला”
- “आमच्यापेक्षा जास्त वेळ घेऊन हनुमान चालिसा वाचून दाखवा”; धनंजय मुंडेंचं विरोधकांना आव्हान
- “ज्यांनी म्हटलं होतं सरकार पडेल, त्यांना आता काय वाटतं, ते मला माहिती नाही”
- “ये रिश्ता क्या कहता है..! भाभीजी युसुफ लकडावाला से क्या ले रही है”