औरंगाबाद : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. हातातील रोजगार गमवावा लागला, तसेच अनेक व्यवसाय देखील बंद झाले. अशात केंद्र सरकार आज कोणत्या मोठ्या घोषणा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अशात सर्वांचे लक्ष्य केंद्र सरकार सर्वांसाठी मोफत लसीची घोषणा करणार का ? याकडे आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करावी विनंती केंद्र सरकारला केली आहे. टिव्ही9 मराठीशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
सध्या देशात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडत आहे. अनेक राज्यांनी कोरोना लस मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र केंद्र सरकारमधील मंत्र्यांची वक्तव्य संभ्रमात टाकणारी आहेत. अशातच आता राजेश टोपे यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करावी अशी विनंती केंद्राला केली आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन भागांमध्ये पार पडणार आहे. ज्यापैकी पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी यादरम्यान पार पडणार आहे. तर, दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात पार पडणार आहे.
Read Also :
- केंद्रीय कृषिमंत्री लोकांपर्यंत योग्य तथ्ये समोर आणत नाहीत, शरद पवारांची टीका
- शरजील उस्मानीचाच मेंदू सडलेला, वक्तव्य हे विकृत मानसिकतेतून, दरेकर संतापले
- राम मंदिरासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्यावतीने 1 कोटींचा निधी, आमदार लांडगेंचा पुढाकार
- भाच्याला मुख्यमंत्री करणे हाच ममता बॅनर्जींचा अजेंडा, अमित शहांचा हल्लाबोल
- तात्याराव लहानेंच्या फडणवीस सरकारवरील ‘त्या’ आरोपांवर दरेकर म्हणाले…