मुंबई : काल राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून देणारी राजकीय घडामोड घडून आली आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेली ईडीची छापेमारी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यापर्यंत आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आलेली आहे.
RSS च्या मुस्लिम शाखा उघडणाऱ्या सरसंघचालकांना फडणवीस ‘जनाब’ म्हणणार का?
यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. ‘घोटाळेबाज लोकांना सोडणार नाही’ असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्ट नेत्यांना एका मागून एक कारवाईला सामोरे जावे लागणार असा काहीसा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
अधिश बंगल्याप्रकरणी कोर्टाने कालच नारायण राणेंना दिलासा दिला होता. श्रीधर पाटणकरांवर कारवाई झाल्यानंतर लगेचच नारायण राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. “आगे आगे देखो होता है क्या” म्हणत नारायण राणेंनी दंड थोपटले आहे. सध्या महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा कळस गाठण्यात आला आहे. सामान्य जनतेचे शोषण सुरु आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकाराला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात असा टोलाही राणेंनी शिवसेनेला हाणला आहे.
शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी; संजय राऊतांनी स्पष्टचं केलं
मागच्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या आल्या. नातेवाईकांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर पडली . ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच आहे, असं म्हणत राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.
Read also:
- “आता ही ईडी गावागावात गेलीय “; मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकावर झालेल्या कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; 6 कोटीपेक्षा अधिक संपत्ती जप्त
- तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा; चंद्रकांत पाटलांचं राज्य सरकारला आवाहन
- उच्च न्यायालयाकडून नारायण राणेंना अधिश बंगल्याप्रकरणी दिलासा ; नितेश राणेंचा सेनेला ‘हा’ गंभीर इशारा
- ”ज्यावेळी माझ्याकडून जिल्ह्याची बदनामी होईल, त्या दिवशी शेवटचा श्वास ”; मुंडे भाऊबहिण आमनेसामने