रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. मात्र राज्यात महायुतीत अजूनही काही जागांवर तिढा कायम राहिला आहे. यातच रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघावरून महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र या जागेवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदेंची शिवसेना काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा….“अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत”, आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं
रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघाची जागा ही शिंदे गटाकडे होती. मात्र ही जागा आता भाजपच्या ताब्यात आली आहे. यामुळे आता नारायण राणे यांचा सामना आता विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासोबत होणार आहे. याआधी शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण यांच्या नावाची चर्चा होती. त्यांनी निवडणुक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र भाजपने जाहीर केलेल्या १३ व्या यादीत नारायण राणेंच्या उमेदवारी शिक्कामोर्तब केलाय.
दरम्यान, महायुतीच्या ज्या जागांवरून भांडणं सुरू आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघाचा समावेश होता. मात्र महायुतीत आता ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. तर नाशिक, पालघर अशा काही जागांवर अद्यापही तोडगा निघालेलाय नाहीय. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जागा या भाजपला जात असल्याने शिंदेंवर नामुष्की ओढवण्याची वेळ आलीय का ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :