मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना त्याचा मोठा फटका बसला. अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सातत्याने आपल्या भाषणांमधून बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. यातच आता शिवसेनेचे विनायक राऊत यांनी बंडखोर आमदार रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“शरद पवारांनी फक्त एक महाराष्ट्राचा दौरा केल्यावर लगेच ते सत्तेवर बसतात”; सुप्रिया सुळे
अलिकडेच ठाकरे कुटुंबीयांवर टिका केल्याने रामदास कदम हे शिवसेनेच्या निशाण्यावर आले होते. त्यानंतर त्यांनी या संपुर्ण प्रकरणाची माफि देखील मागितली होती. यावरूनच शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रूजवली असल्याची टिका विनायक राऊतांनी केली आहे. रामदास कदम जी काही बडबड करतात, त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.
6 जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळायला ‘फडणवीस’ ‘स्पायडरमॅन’ आहेत का ? नाना पटोले
तसेच राऊतांनी एक नारायण राणेंचा किस्सा देखील त्यांनी सांगितला. नारायण राणे शिवसेना सोडून जात चालले होते, तेव्हा हेच रामदास कदम यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्कामी होते. नारायण राणे यांच्यासोबत राणे गटात या, असे शिवसैनिकांना सांगण्यात कदम आघाडीवर होते, असा गंभीर आरोप देखील राऊतांनी रामदास कदम यांच्यावर केला आहे.
Read also
- “मुंबईत महानगरपालिकेत पैसे खाणारे कोण बोके होते? हे मला माहितीय”; उदय सामंत
- “अंगाला हळद लावून बसलेले बच्चू कडू लग्न लवकर होईना म्हणून..;” राष्ट्रवादीने डिवचलं
- महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत
- ठरलं तर..! शिवसेना नेमकी कुणाची? निवडणुक आयोगाने केलं स्पष्ट
- “महाराष्ट्र मॉडेलच सर्वोत्तम पाहिजे, गुजरातला कशाला जातात”?; रूपाली पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा