बुलढाणा : राज्यात अलिकडे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर अनेक शहरात, गावांत पाणी साचल्याने लोकांचे प्रचंड हाल झालेत. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री या भागाची पाहणी देखील करायला आले नाहीत. त्यामुळे जमत नसेल तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार रविंद्र तुपकर यांनी केली आहे.
हेही वाचा…‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर ! ‘महाविजय २०२४’चे लोकसभा समन्वयकपद आणि ‘हर घर तिरंगा’ची जबाबदारी
मोठा प्रसंग जिल्ह्यात आला, अन् जिल्ह्याचे पालकमंत्री साधी पाहणी देखील करायला आले नाहीत. जमत नसेल तर गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा, जनतेला का वेठीस धरावं ? असा सवाल रविंद्र तुपकर यांनी केला आहे. तर दुसरा पालकमंत्री असता तर तो जिल्ह्याची पाहणी देखील करायला आला असता असं देखील म्हणत रविंद्र तुपकर यांनी गुलाबराव पाटलांवर टिकास्त्र सोडलं.
हेही वाचा…विजय वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेते पद, नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा धोका वाढला”
दरम्यान, दुसरा पालकमंत्री असता तर आतापर्यंत जिल्ह्याचा विचार केला असता. त्यांनी त्या ठिकाणी प्रशासनाला काही सुचना दिल्या असता. अन् लोकांना थोडीशी का होईना मदत झाली असती. परंतु गुलाबराव पाटील हे कोणत्या काळजाचा माणुस आहे. त्यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यावर त्यांची वक्रदृष्टी आहे. त्यांची दुश्मनी आहे का ? गुलाबराव पाटील तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे हे लक्षात ठेवा. सभागृहात काय अंड उबवायला जातात का ? असा खोचक टोला देखील रविंद्र तुपकर यांनी गुलाबराव पाटलांना लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देण्याऱ्याला भाजपने कार्यकारिणीत घेतलं, सुप्रिया सुळेंचा संताप, थेट “फडणवीसांना…”
हेही वाचा…शिरुर लोकसभा प्रमुख महेश लांडगे, समन्वयकपदी राजेश पांडे : ‘त्या’ चर्चेत तथ्य नाही!
हेही वाचा…“शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, म्हणूनच..,” आव्हाडांचा भाजपला टोला
हेही वाचा…“..त्यामुळे राज्यात पुन्हा आघाडीचं सरकार येईल,” जयंत पाटलांचं भाकित